|
चाहूल अज्ञाताची
Author: दत्ताराम माधवराव गावंड
Publisher: मॅजेस्टिक प्रकाशन
|
|
Price: $6.85 $5.48 20% OFF ( ~165 Pages, R200)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: परमपूज्य दादाजी हे एक लोकविलक्षण व्यक्तिमत्त्व आहे. भारतीय अध्यात्मवादी विचारवंतांच्या परंपरेत गौरवाने बसू शकेल असा हा एक सिद्धपुरुष आहे. चाहूल अज्ञाताची या पुस्तकातले त्यांचे विचार हे एकीकडून उत्स्फूर्त कवितेशी नाते जोडतात तर दुसरीकडून ते मनोविज्ञांच्या सूक्ष्म विचारांशी जवळीक साधतात. मन या अतिसूक्ष्म, रुपहीन, प्रयोगातीत आणि अपार शक्तिमय अशा संकलनेबद्दल दादांजीनी केलेले भाष्य इथे सूक्ष्मरुपाने मांडलेले आहे. ते प्रत्येकालाच आपल्या मनाची ओळख करून घेण्यास साह्यकारी ठरेल. या मनाचे निरीक्षण केले. त्याचे व्यापार अवलोकिले व ते आपल्या ताब्यात आणले तर तेच तुम्हाला मनापलिकडे असणार्या पूर्ण आनंदमय स्थितीला नेऊन पोचवते-हा पूज्य विचार दादाजींनी या पुस्तकात परोपरीने मांडला आहे. -- शांता शेळके
चाहूल अज्ञाताची हे दादांचे पुस्तक साक्षात्कारी जाणिवेतचा आविष्कार आहे. घटपट सिद्धान्त चर्चेतून ते निर्माण झालेले नाही. नवा धार्मिक पंथ उभा करून प्रेषित बनण्याची हाव इथे नाही. कसल्याही महत्त्वाकांक्षेचा ओझरता स्पर्शही या पुस्तकाला झालेला नाही. हे पुस्तक मोक्ष मिळवण्याचे कसलेही तयार साचे देत नाही, कोष्टके पुरवत नाही, सोप्या युक्तया सांगत नाही. संवेदनशील अलिप्तपतेने दादा स्वत:ला सामोरे जातात. व्यवहारापासून तो थेट अध्यात्मापर्यंत, काहीतरी मिळवण्याच्या तृष्णेच्या धावा खुंटल्यावर, जे साक्षित्व उगवते तीच मनाच्या चलाख खेळांपासून मुक्त असलेली सर्जनशील अवस्था. ही सर्जनशीलता गतकालीन स्मृतींचे एकावर एक चढलेले मनोमय थर भेदीत जाते; आणि जे मन जिंकता येत नाही ते विनाप्रयत्न मावळते. फसवत आलंय हे मन तुम्हाला शतकानुशतके गुणी बनवण्याच्या अभिलाषेत असे दादा म्हणतात ते याच अर्थाने. दादांचे बोलणे स्पष्ट, सरळ आहे. त्यांची भाषा ही आक्रमक युक्तिवादाची नसून, निर्मळ प्रत्ययाची आहे. प्रत्ययाची ही भाषा ऊर्जेच्या मुक्त विहाराचा स्पर्श घडवते, ध्यानमय अवधान निर्माण करते, अधुनैव सुखी शान्तो बन्धमुक्तो भविष्यसि अशी खात्री पटवते. -- मंगेश पाडगांवकर
|
 |
 |
|