|
मराठ्यांचा युद्धेतिहास
Author: का. ग. पित्रे
Publisher: कॉंटिनेंटल प्रकाशन
|
|
Price: $8.37 $6.69 20% OFF ( ~340 Pages, R275)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: मराठ्यांचा इतिहास युद्धाने सुरु होतो व त्याचा अंतही युद्धानेच होतो. प्रथम दक्षिणेत व नंतर सबंध हिंदुस्थानावर त्यांनी तलवारीच्या बळावर व घोड्यांच्या टापांच्या निनादात सत्ता स्थापन केली. जेव्हा तलवार बोथट झाली व हात निष्प्रभ झाले तेव्हा मराठी सत्तेचा सूर्य अस्तास गेला. हिंदुस्थानचा सतराव्या शतकाचा इतिहास म्हणजेच मराठ्यांचा इतिहास. ह्या काळात मराठे सिंधू नदी पार करुन अटकेवर भगवा झेंडा फडकवून आले व त्यांनी उत्तर हिंदुस्थानावर दरारा बसवला. लढाईच्या तंत्राची परीक्षा लढाईतच होते. सैन्याची तयारी व युद्धसामग्री ही देशाच्या तांत्रिक प्रगतीचे दर्शक असते. मराठ्यांनी वेगवेगळ्या शत्रूंशी चार हात करताना वेगवेगळी तंत्रे वापरली. त्यांनी अरबी समुद्रावर वर्चस्व स्थापन केले. राजकारणात सर्वांत प्रभावी अस्त्र म्हणजे युद्ध. त्यामुळे देशाचे संरक्षण धोरण राजकर्त्यांनी आखावयाचे असते. ते फक्त कृतीत आणण्याचे काम संरक्षण दले करतात. राष्ट्रीय धोरण ठरल्यावर त्यांची अंमलबजावणी कशी करावी हे संरक्षण दलांनी ठरविले पाहिजे व तशी त्यांना पूर्ण मुभा हवी. जगात शास्त्राने प्रचंड प्रगती केली आहे त्यांचा परिणाम युद्धकलेवर व युद्धशास्त्रावर साहजिकच होणार. त्यामुळे निव्वळ राज्यकर्ते अथवा सेनानी युद्ध चालवू शकत नाहीत . त्या दोघांचा मेळा असावा लागतो व एकविचाराने त्यांना चालावे लागते. 'मराठ्यांचा युद्धेतिहास' ह्या पुस्तकात इ. स. १६०० ते १८१८ या काळात मराठा फौजांची उभारणी व वाटचाल तसेच मराठा आरमाराची स्थापना व कामगिरी यांचा विस्तृत आढावा घेतला गेला आहे. बदलत्या काळाप्रमाणे ईस्ट इंडिया कंपनीच्या विरुद्ध झालेल्या मराठ्यांच्या लढायांचा आधुनिक युद्ध तत्वे डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केला आहे.
|
 |
 |
|