|
सांगण्यासारखं आहे म्हणून
Author: सदानंद देशमुख
Publisher: सुधांशु प्रकाशन
|
|
Price: $6.16 $4.92 20% OFF ( ~174 Pages, R180)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Review courtesy of Maharashtra Times: तात्कालिक तरीही टिकाऊ - अभि सारंग
वृत्तपत्रांमध्ये केले जाणारे लेखन हे तात्कालिकच असते. त्या लिखाणावर जशी वेळेची करवत असते, तशा विषयांच्या चौकटीही पडून जातात. अनेकदा एखाद्या विषयावर लिहिणे, ही गरज असते. या सार्या चक्रातून लेखनाचा ताजेपणा आणि तात्कालिकतेचा शाप चुकविणे, हे फार कठीण असते. कृषिवलचे संपादक एस. एम. देशमुख यांनी लिहिलेल्या लेखांमध्ये असा ताजेपणा दिसतो.
त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्रात लिहिलेल्या सदरातील हे निवडक लेख आहेत. श्री. देशमुख यांना बहुतेकदा त्या-त्या वेळी घडलेल्या घटनांनी विषय पुरविला आहे. पण त्या विषयाचा परामर्श घेताना लेखकाचे मूळ मूल्यांचे भान कधी सुटत नाही. उदाहरणार्थ, शरद जोशी यांच्याविषयी लिहिताना ते जोशींची ताकद घटण्यापेक्षा शेतकर्यांची चळवळ कमकुवत होण्याचे दु:ख मोठे असल्याचे नमूद करतात आणि त्याचवेळी या चळवळीने महाराष्टृचे समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण कसे ढवळून काढले, याचे ते मार्मिक चित्र उभे करतात. श्री. देशमुख यांना कोणताही छोटा-मोठा विषय त्याज्य वाटत नसल्यानेच वाचकांना या सदराची दर आठवडयाला प्रतीक्षा असे. या विषयांमध्ये आमचीच देवळे अस्वच्छ का असतात, इथपासून डाव्यांनी आता बदलले पाहिजे, असा डाव्यांना चार शब्द सुनावणारा विषयही असतो. शिक्षणाचा प्रसार झाल्याचा डिंडिम वाजत असताना रायगड जिल्ह्याच्या एका आदिवासी पाडयातील पहिली मुलगी मॅटिऋक व्हायला स्वातंत्र्याची पन्नास वर्षे जावी लागली, हा अनुभव ते संवेदनशीलतेने टिपतात. खेडयांविषयी शहरी माणसांच्या कल्पना बर्याचदा रोमॅण्टिक असतात. पण खेडयांचे भकासपण तेथे कायम राहणार्यांनाच जाणवते. ते लेखक मोजक्या शब्दांत दाखवतो. देशमुख यांचे हे पाचवे पुस्तक आहे. सोपेपणा आणि त्याचवेळी त्यात दिसणारी सामाजिक जाणिवेची धार ही वैशिष्टये त्यांचे लिखाण वेधक करतात.
|
 |
 |
|