|
श्रीज्ञानदेवांचा हरिपाठ (सार्थ)
Author: के. वि. (बाबा) बेलसरे
Publisher: त्रिदल प्रकाशन
|
|
Price: $6.85 $5.48 20% OFF ( ~220 Pages, R200)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: मन आणि वाणी दोन्ही अनंत व अतींद्रिय भगवंतापर्यंत पोचूंच शकत नाहीत. असें असून देखील थोर संत भगवंताचे स्वरूप, त्याच्या दर्शनाचा आनंद आणि त्याचे नाम यांबद्दल सामान्य माणसांना जन्मभर सांगत राहिले. संतांच्या या वागण्याला सबळ कारण आहे. तें असें की ज्याला भगवंताचे दर्शन होते त्याला पूर्ण समाधान प्राप्त होते. पण त्या समाधानाबरोबरच त्याच्या मनामधे अज्ञानी व म्हणून असमाधानी असलेल्या जीवांबद्दल असीम करुणा उत्पन्न होते. भगवंताच्या दर्शनाचा आनंद मोठा अपूर्व आहे. त्या आनंदाच्या द्वारा प्रत्यक्ष भगवंत संतांमधे अवतरतो. तो आनंद सर्वांना भोगायला मिळावा ही भगवंताला शोभणारी नि:स्वार्थी तळमळ संतांच्या जीवनांत प्रगटते. तिचे दृश्य रूप म्हणजे शब्दांत न सांगता येणारी आपली आनंदानुभूति संत जगाला सांगतात. भगवंत सर्वांना तोच आहे, म्हणून त्याच्या दर्शनाचा आनंद सर्व संतांना सारखाच असतो. तसेंच सर्व संतांना अज्ञानी जीवांबद्दल सारखीच तळमळ असते. याचा परिणाम असा होतो की भगवंताचे दर्शन आणि तें दर्शन करून देणारें भगवंताचें नाम यांची यथार्थ कल्पना सामान्य माणसाला कशी करून देता येईल ही अडचण संतांना भासते. भगवंताच्या दर्शनाचा आपला आनंद आणि तो स्वाधीन करणार्या नामाचें माहात्म्य सर्वसामान्य माणसांपर्यंत जसेंच्या तसे पोचवणे सोपे नसते. म्हणून पुष्कळ संत याबाबतीत मौन स्वीकारतात. पण सातशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रांत श्रीज्ञानदेव जन्मास आले. भगवत्स्वरूपाची त्यांची अनुभूति प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या अनुभूतीइतकी महान होती. शिवाय आपल्या मनातील तरल भाव अगदी उचित शब्दांमधे व्यक्त करण्याची दुर्मिळ कला त्यांच्या ठिकाणी जन्मजात होती. त्या कलेच्या जोडीला जगांत उधळलेलें ईश्वरी सौंदर्य वेचण्याची रसिकता त्यांच्या अंत:करणांत भरून वाहात होती. अशा श्रीज्ञानदेवांना त्यांच्या गुरुंनी भगवंताचें नाम दिले. त्या नामाला घट्ट धरल्याने त्यांना भगवंताचें दर्शन झाले. त्या दर्शनाने त्यांचे जीवन परमानंदानें आकंठ भरले. त्यामुळे भगवंताचे नाम हे त्यांच्या जीवनातील सर्वोत्तम मूल्य झाले.
|
 |
 |
|