|
पत्राद्वारे सत्संग
Author: के. वि. (बाबा) बेलसरे
Publisher: त्रिदल प्रकाशन
|
|
Price: $4.79 $3.83 20% OFF ( ~200 Pages, R150)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: श्री राम.
ती. बाबांचा साधेपणा अगदी स्वाभाविक होता. पण त्यांच्या मुखावर त्यांच्या ज्ञानाचे तेज दिसत असे. त्यांच्याशी बोलल्यावर त्यांच्या ज्ञानाचा आत्मविश्वास ऐकणार्याला जाणवत असे. अनेक बरे-वाईट प्रसंगातून , काही वेळी संकटातून आम्ही गेलो पण ती.बाबा त्या प्रसंगी अत्यंत खंबीरपणे उभे असत. त्यांची वृत्ती कायम स्थिर असे. त्यांच्या शब्दात त्यांचा पोइसे कधीही ढळला नाही. ते निवृत्त झाल्यावर त्यांना जे काही धन मिळाले ते अत्यंत तुटपुंजे होते. पण त्याची बाबांनी कधी काळजी केली नाही. त्यांना अत्यंत मोठा मान मिळाला पण त्याचा त्यांच्यावर कधीही काहीही परिणाम झाला नाही. ते नेहमी म्हणत की " मी तुमच्यातलाच आहे. " आणि आपले मोठेपण त्यांनी लपवून ठेवले. श्रीमहाराजांनी त्यांना अमानित्वाचा अभ्यास करण्यास सांगितले होते त्याचा परिणाम म्हणून ती. बाबानी मोठेपणा मिळण्याचे प्रसंगच टाळले.
मला एक गोष्ट सहज सांगावी असे वाटते. संध्याकाळची आरती झाल्यावर श्रीमहाराज बसत असत. त्यानंतर कधीकधी तात्यासाहेब , बाबा व इतर लोक यांच्यात श्रीमहाराजांच्या गोष्टी निघत असत. त्यावेळी रात्रीचे किती वाजले याचे कोणालाही भान नसे. या बाबतीत पुढे ती.बाबा मला म्हणाले की , " ते सोनेरी दिवस होते ! "
१९६७ साली श्रीमहाराजांची व ती. बाबांची अखेरची भेट झाली. त्या वेळी मी व सौ.आई हजर होतो. ती. बाबांना श्रीमहाराजांनी दोन गोष्टी सांगितल्या..पहिली ' सर्व जणांना नामाला लावावे ' व दुसरी ' सर्वांना धीर द्यावा.' ती. बाबांना भेटण्यास असंख्य माणसे येत असत. त्याना ती. बाबा नामाचे महत्व तर सांगत असतच पण परिस्थितीने गांजलेल्या , क'टाळलेल्यांना ते धीर देत असत. म्हणजेच श्रीमहाराजांची आज्ञा त्यांनी तंतोतंत पाळली. अगदी शेवटपर्यंत श्रीमहाराजांच्या सांगण्यावरून ती. बाबानी त्यांच्या निरोपाच्या आर्या रचल्या. ( निरोप , सुबोध नव्हे ) त्यात त्यांनी म्हणल्याप्रमाणे " नामापरते न सत्य मानावे " हे आपल्या जीवनात खरे करुन दाखविले !
( ' पत्राद्वारे सत्संग ' या श्री श्रीपाद बेलसरे यांनी संकलन केलेल्या पुस्तकातील निवेदनामधील काही भाग )
|
 |
 |
|