|
चौफेर भाग १
Author: माधव गडकरी
Publisher: श्रीविद्या प्रकाशन
|
|
Price: $12.18 $9.74 20% OFF ( ~320 Pages, R400) Was recently Out of Print.*
Was recently Out of Print. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books.
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: मनोगत सदराचे नावही असे अचानक सुचले. भारत-न्यूझीलंड क्रिकेट सामना तेव्हा सुरू होता. मराठीतून धावते समालोचन चालू होते व चौफेर टोलेबाजीचा वृत्तान्त दिला जात होता. त्यामधील 'चौफेर' शब्द मी उचलला. सदराची व्याप्ती चीफेर करण्यास या नावाची मला मदत झाली. हे नावही लोकप्रिय झाले. इतके की, नागपूरमध्ये एकाने या नावाने साप्ताहिक काढले. हे नाव वापरण्याची परवानगी मागितली. आज 'चीफेर' सदरातील मजकूर दोन दैनिके व तीन साप्ताहिके सरळ उचलून प्रसिद्ध करतात. ज्या ठिकाणी 'मुंबई सकाळ' जात नाही तेथे 'चौफेर' सदर जाते अशी स्थिती आज झाली आहे. दि. १९ नोव्हेंबर १९७६ पासून हे सदर सुरू झाले व माझा हा रोजचा लेखनयश सुरू झाला. फक्त रविवार अंकात 'चौफेर' सदर नसते. लेखन चांगले व्हावे म्हणून ते मुख्यत्वे मी सकाळी घरी केले. त्यासाठी वाचन हये म्हणून आधी दिल्ली, मद्रास, कलकत्ता येथील वृत्तपत्रे रात्री नियमित वाचू लागलो. या सदरातील लेखन पुन्हा वृत्तपत्रातील विषयांपुरते मर्यादित नाही. किंवा विषय वृत्तपत्रातून आला तरी त्यासाठी पुस्तके शोधावी लागली. त्याला प्रवास व गाठीभेटींची जोड मिळाली. वाचकांनाही मोठ्या माणसांचे प्रत्यक्ष बोलणे वाचायला आवडते. संवादांना फार महत्त्व असते. महत्त्वाच्या घटन देशात कुठेही घडल्या तरी तेथे हजर राहाण्याचा उद्योग मी नेहमी करीत आलो. टेबल जर नॅलिझम ' मी कधीच मानला नाही. परंतु जेथे गेलो तेथील काही तरी वाचकाला दिले. गावांच्यासुद्धा व्यक्तिरेखा लिहिल्या. शेगावपासून भिवंडीपर्यंत अनेक गाये आली. वाईपासून मेणवलीपर्यंत या सदराने भ्रमंती केली. दिली व राजधानीचे राजकारण अनेकदा आले. गेल्या पाच वर्षात जितके लिहिले ते छापावयाचे म्हणजे १५०० पानांचे पुस्तक झाले असते. त्यामधील अगदी निवडक या ग्रंथात आणले. " वृत्तपत्रात जे प्रसिद्ध होते, त्यामधून जे टिकते ते साहित्य, जे टिकत नाही ते वृत्तपत्रीय लेखन." हा संदेश मनात याळगून लेखन केले. कोणत्याही विषयावरील प्रतिक्रिया लिहिताना केवळ टीकाटिप्पणीपेक्षा माझ्या जीवनानुभवाला मी महत्त्व दिले. 'चीफेर' सदर म्हणजे माझाही पाच वर्षांचा वैचारिक व प्रत्यक्ष प्रवास आहे. काही वर्षानंतर वाचणाभ्यांना या कालखंडाचे सामाजिक, आर्थिक व राजकीय चित्र हे पुस्तक उभे करील असा मला विश्वास आहे. एकीकडे समाज प्रबोधन व दुसरीकडे विचार मंथन असा एक धागा या लेखनात अखंडपणे जपला आहे. तो किती यशस्वी झाला हे वाचकांनी ठरवावयाचे आहे.
|
 |
 |
|