|
ज्ञानयज्ञातील समिधा
Author: गोपाळ गोडसे
Publisher: अजब प्रकाशन
|
|
Price: $6.23 $4.98 20% OFF ( ~260 Pages, R175)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: प्रस्तावनेतून ... कै.गोपाळ गोडसे यांचे अनेक लेख दैनिक सामना सारख्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले आहेत. अनेकजणांनी त्या लेखांची प्रशंसाही केली आहे. काहीजण त्या लेखांची कात्रणे काढून, जतन करून ठेवत असत. त्याला नेटकेपणा यावा म्हणून त्यातील निवडक लेख ग्रंथरूपाने प्रकाशित केले आहेत. विविध विषयांवर बापूंनी विपुल लिखाण केले. त्यातील काही लिखाण प्रासंगिक व प्रतिक्रियात्मक अशा प्रकारचे होते, तर काही लिखाण स्वयंप्रेरणेचे होते. त्यांनी आयुष्यभर अखंडपणे विविध ग्रंथांचे वाचन केले. व्यासंगी वाचन आणि सखोल चिंतन यांच्या आधाराने विद्वत्तापूर्ण लिखाण केले, त्याचा आम्हा गोडसे कुटुंबियांना सार्थ अभिमान वाटतो. आपला विषय ते तर्कशुद्धपणे व सप्रमाण मांडतात, याचा प्रत्यय त्यांचे लेख वाचताना पदोपदी येतो. त्यांच्या मनात उद्दिष्टांची निश्चिती आहे. त्यांना जनमानस घडवायचे आहे. त्यांची भूमिका स्पष्ट आणि परखड स्वरूपाची आहे. सनातन वाङ्मयातील दाखले व आधुनिक शास्त्रांचा आधार या दोहोंचा समन्वय बापूंनी आपल्या मौलिक लेखनात साधला आहे. त्यांच्या मनातील जनप्रबोधनाची कल्पना कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने हा ग्रंथप्रपंच उभा केला आहे. स्वा.सावरकरांच्या छायेत बापूंचा जीवनप्रवास झाल्यामुळे त्यांच्या प्रखर हिन्दू राष्ट्र निष्ठेचा व त्याला पूरक आणि पोषक ठरणाच्या अन्य तत्त्वांचा प्रभाव त्यांच्यावर झाल्याचे लेख वाचताना पदोपदी जाणवते. व्यापक आणि उदात्त साध्य सिद्ध करण्याकरितो कोणत्याही देशभक्त व्यक्तीला त्यागमय जीवन जगावे लागते. हा स्वा.सावरकर प्रणित अनमोल संदेश प्रत्यक्षात कार्यवाही करणा-यांपैकी बापू हे एक सैनिक होते. देशाचे स्वातंत्र्य, स्वातंत्र्याचे रक्षण आणि समाजाचा सर्वांगीण उत्कर्ष हे राष्ट्रत्वाचे प्रधान पैलू सातत्याने उराशी बाळगणाच्या व त्यांची प्रत्यक्ष कार्यवाही करणाच्या निष्ठावान कार्यकत्र्यात बापूचे स्थान मोठे आहे. बापूंच्या लेखांची भाषा सोपी व सुटसुटीत आहे. वाचकाला त्या भाषेतून व्यक्त केलेले विचार भावतील असा आम्हाला विश्वास वाटतो. -- नाना गोडसे
|
 |
 |
|