|
हिमालयाची सावली
Author: वसंत कानेटकर
Publisher: पॉप्युलर प्रकाशन
|
|
Price: $5.14 $4.11 20% OFF ( ~90 Pages, R150)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: आद्य शिक्षण महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आयुष्याचा वेध घेताना त्यांना समांतर अशी गुंडो गोविंद भानू ही व्यक्तिरेखा निर्माण करत महर्षी कर्व्यांच्या पत्नीचा अक्ष कल्पून त्याभोवती रेखलेलं तीव्र ताण्याबाण्यांचं नाट्यवर्तुळ म्हणजे 'हिमालयाची सावली' होय. व्यक्तिरेखाटन, प्रसंगनिर्मिती आणि आणि या दोन्हींतून साधली जाणारी चढत्या भाजणीची नाट्यमयता याचं आदर्श उदाहरण म्हणजे हे नाटक. नाटकाच्या नावातून सूचित होतं की, ते गुंडो गोविंदांपेक्षा बयोचं नाटक आहे. पण सावलीकडे निर्देश करून ते लक्षणार्थाने हिमालयाच्याच थोरवीबद्दल सांगतं आहे. खाष्ट आणि बोलभांड बयोला नाटकाची प्रतिनायिका म्हणून कानेटकर उभी करतात आणि मुखदुर्बळ नायकाचं कर्तृत्व द्वंद्वात्मक विरोधातून उभं करण्याची यशस्वी चाल खेळतात, अन्यथा कशाचाच प्रतिवाद करू न शकणारा चरित्रनायक नाटकासाठी अनुकूल ठरता ना. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे यात अनेक संघर्षबिंदू आहेत अणि ते सगळेच प्रभावीपणे एकमेकांशी ताणून धरलेले आहेत. घरदार, नातीगोती, मानमरातब आणि लौकिक हे सगळं विसरून केवळ अनाथ अबला आश्रम हेच आपलं जीवितकर्तव्य मानणार्या गुंडो गोविंद अर्थात नानासाहेब यांचा पहिला संघर्ष हा घरापासूनच सुरू होतो. बयो आणि नाना हा उघड संघर्ष तर नाटकभर चालू आहेच, पण मुलाच्या उच्च शिक्षणासाठी मदत नाकारणारा आणि पोटच्या मुलीच्या लग्नाआड येणारा बाप म्हणून ते टीकेचे धनी ठरले आहेत. त्यांच्या समाजसुधारणांना विरोध करणार्या सनातन्यांची त्यांना मारहाण आणि धक्काबुक्की करण्यापर्यंत मजल जाते. नानासाहेबांच्या महिलाश्रमाला सढळहस्ते मदत करणार्या धनिक शेटजींना खुद्द नानांचाच विरोध आहे आणि त्यामुळे संस्थेतल्या लोकांचा नानांना विरोध आहे. म्हणजे व्यक्ती-व्यक्ती, व्यक्ती-कुटुंब, व्यक्ती-समाज आणि व्यक्ती-संस्था असा चौपदरी संघर्ष इथे दिसतो. नानांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि त्याविरोधात बंड करून उठणारं शरीर असा नानांच्या आत एक आंतरिक संघर्ष सुरू आहे तो वेगळाच. गमतीशीर गोष्ट म्हणजे ज्या संस्थेशी नानासाहेब एकरूप झाले आहेत ती संस्थाच त्यांच्या विरोधात जाते आणि जी बयो नानांना सदैव विरोध करत असते ती एकटी त्यांच्या बाजूने उभी राहाते. रचनेतली ही नाट्यमयता आणि कथनकातली संघर्षमयता यांमुळे नाटकाची पकड अखेरपर्यंत सुटत नाही.
|
 |
 |
|