|
रांगोळी
Author: अनुराधा गांगल
Publisher: ग्रंथाली प्रकाशन
|
|
Price: $6.16 $4.92 20% OFF ( ~180 Pages, R180)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: ' रांगोळी ' या पुस्तकात जुने पुणे , सांस्कृतिक लाटांवर तरंगणारे नेहरूनगर इथपासून ते थेट आजच्या अत्याधुनिक अमेरिकेपर्यंत प्रचंड मोठ्या अशा स्थलकालाच्या प्रांगणात ही रांगोळी अनुराधाताईंनी अतिशय उत्कृष्टपणे रेखाटली आहे. अनेक क्षेत्रांत नामवंत बनलेल्या लेखक , चित्रकार , पत्रकार अशा मंडळींची विविध रूपे आपल्याला या लेखांमधून उमटलेली दिसतात. सरोजिनी वैद्यांसारख्या एका महान विदुषीशी अनुराधाताई बहिणीच्या जिव्हाळ्याने जोडलेल्या होत्या. गणेशचतुर्थीला अनुराधाताई मोदक वळत बसलेल्या असताना सरोजिनीबाई त्यांच्या घरी आल्या आणि अनुराधाताईंच्या कामात मदत करण्यासाठी पुढे होत म्हणाल्या , ' अनुराधा , बघू गं. मला तरी दे. वळता येतं का ते बघते!... ' यावरची अनुराधाताईंची प्रतिक्रिया विलक्षण आहे. त्या म्हणतात , ' एवढी मोठी , मराठी भाषेला वळण देणारी ही बाई , एवढीशी लाटी घेऊन मला ती वळता येते का बघू- म्हणत होती! ' रायगड जिल्ह्यातल्या गोरेगावच्या ' गरिबांचे वकील ' आणि दलितमित्र म्हणून गौरवल्या गेलेल्या चंद्रकांत अधिकारी यांच्या पत्नी उषाताई यांच्या जीवनानुभवाचे वर्णन करताना त्यांच्या लेखणीला बहार येते. किंबहुना , बाबासाहेब आंबेडकरांपासून लक्ष्मणशास्त्री जोशींपर्यंत विविध मंडळींचा पाहुणचार हसतमुखाने आणि प्रेमाने करणार्या उषाताईंची संतुष्टता आणि तृप्ती चळवळीच्या वातावरणात वावरणार्या अनुराधाताईंना स्वाभाविकपणे पटते , कळते आणि वळते आणि त्यामुळेच त्या ती आपल्यासमोर सार्थपणे साकारतात. भातुकलीच्या खेळावर लिहिता-लिहिता अनुराधाताईंनी केलेली अनेक भाष्ये जीवनाच्या गाभ्याला हात घालतात. ' एकटे-एकटे खेळायला हा खेळ मजा आणत नाही , आणि मैत्रिणीबरोबर मांडल्यावर तो मोडताही येत नाही - अगदी मैत्रिणीशी भांडण झाले तरीही! ' असे सांगून त्या पुढच्या पानावर , आधुनिक जगात होणार्या ' घडणे आणि मोडणे ' याच्या खेळाशी त्याची तुलना करतात आणि लेखाच्या अखेर थेट देशाच्या पातळीवर जाऊन ' बातम्यांचा भातुकलीचा खेळ ' आपल्यासमोर मांडून आपल्याला विचारप्रवृत्त करतात. ' माझे पुणेरी दादा ' हा लेखही त्यांनी जिव्हाळ्याने , पण समतोल लिहिला आहे. अतिशय कष्टाने वडिलांनी आपले जीवन कसे घडवले , मुलांवर चांगले संस्कार व्हावे यासाठी ते कसे जागरूक असत , या सार्या गोष्टी सांगताना त्या भावनांमध्ये रंगल्या , तरी भावविवश झालेल्या नाहीत. -- नंदिनी थत्ते, म. टा. १८ नोव्हेंबर २०१२
|
 |
 |
|