|
गुजरात पॅटर्न
Author: प्रमोद मुजुमदार
Publisher: अक्षर प्रकाशन
|
|
Price: $3.42 $2.73 20% OFF ( ~116 Pages, R100)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: मोदींच्या गुजरातमध्ये झालेल्या नरसंहाराचा वेध.
Review courtesy of Loksatta: लोकसत्ता रविवार, १८ मे २००३
भय इथले संपत नाही...
गोधर आणि त्यानंतरची गुजरात दंगल या दोन्ही घटनांना आता वर्षभरापेक्षा अधिक काळ लोटला आहे. अशा घटना पुन्हा होऊ नयेत अशी कुणाही सुबुद्ध, संवेदनशील नागरिकाची इच्छा असली, तरी 'गुजरात पॅटर्न' देशभर राबवला जाईल, अशीही बतावणी वेगवेगळ्या पातळ्यांवरुन हळूहळू सुरु आहे.
काय आहे हा गुजरात पॅटर्न?
गोध्र्याची दुर्घटना आणि त्यानंतरची गुजरात दंगल... दोन्ही घटनांमध्ये मिळून हजारो नागरिकांची क्रूर कत्तल. आधी किती हिंदू मारले गेले आणि नंतर किती मुस्लिम मारले गेले अशी धर्मवार चर्चाच गैरलागू ठरावी, असं हत्याकांड... भारतात अशा दंगली आजवर कमी झाल्या नाहीत. पण तरीही गुजरात दंगल यापूर्वीच्या सगळ्या दंगलींपेक्षा 'वेगळी' आणि 'वैशिष्ट्यपूर्ण' ठरली. ती कशी ते समजूत घेण्यासाठी 'गुजरात पॅटर्न' हे पुस्तक वाचणं आवश्यक आहे.
गुजरात दंगलीने अस्वस्थ झालेल्या मुंबई तसेच अहमदाबादमधल्या काही लोकशाहीवादी नागरिकांनी 'सिटिझन्स फॉर जस्टीस अॅण्ड पीस' ही समिती स्थापन केली. गुजरातमध्ये नेमकं काय घडलं, ते सर्वांना समजण्यासाठी या समितीतर्फे आठजणांचा एक 'जागृत नागरिक लवाद' नेमण्यात आला. उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, निवृत्त आयपीएस अधिकारी, माजी पोलीस महासंचालक, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश या लवादात होता. लवादाने २ मे ते १३ मे २००२ या काळात गुजरातमधल्या हिंसाचारग्रस्त भागाला भेट देऊन दंगलीच्या काळात घडलेल्या घटनांचा मागोवा घेतला, एकूण २०९४ लेखी, तोंडी साक्षी घेतल्या. या साक्षीदारांमध्ये वैयक्तिक साक्षी नोंदवणारे होते, तशाच सामाजिक संघटना होत्या, सरकारी अधिकारी होते, पोलीस अधिकारी होते, राजकीय कार्यकर्ते होते. या बारा दिवसांच्या पाहणीनंतर साक्षी, अन्य सत्यशोधन समित्यांचे अहवाल एफा आयाअरच्या नकला, जमा झालेले फोटो, दृक्ष्राव्य कॅसेट यांच्या आधारे लवादाने दोन खंडांमध्ये आपला 'क्राईम अगेन्स ह्युमॅनिटी' हा अहवाल दिला. त्यापैकी पहिल्या खंडात गुजरातमध्ये झालेल्या हिंसाचाराची माहिती आहे, तर दुसर्या खंडात निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.
या अहवालात काय आहे, याबद्दलची थोडकयात पण नेमकी माहिती प्रमोद मुजुमदार यांनी 'गुजरात पॅटर्न' या पुस्तकात दिली आहे. गोधरमध्ये नेमकं काय घडलं, इथून हे पुस्तक सुरु होतं आणि देशातील मुस्लिमांचा वंशविच्छेद करण्यासाठी आखलेली अघोरी योजना म्हणजे 'गुजरात पॅटर्न' या निष्कर्षापर्यंत येतं.
या पुस्तकाच्या पहिल्या खंडात आपल्यासमोर जे येतं, ते अत्यंत भयप्रद आहे. गुजरातमधली दंगल ही गोधर घटनेची 'उत्स्फूर्त' प्रतिक्रिया होती, असं वळण देण्याचा अगदी वरिष्ठ पातळीवरुन प्रयत्न झाला असला, तरी ही दंगल अत्यंत सुनियोजित, 'स्टेट स्पॉन्सर्ड' कशी होती, हा मुद्दा या पुस्तकातून पहिल्यापासून अधोरेखित होत जातो. आधी म्हटल्याप्रमाणे या आधीच्या दंगलींपेक्षा गुजरात दंगल वैशिष्ट्यपूर्ण होती ती इथे... एका विशिष्ट जमातीचं हत्याकांड घडवण्यासाठी संपूर्ण राज्ययंत्रणा इथे अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात आली. राजकीय प्रशासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा दंगलखोरांना कशी अनुकूल होती, एवढंच नव्हे तर दंगलीच्या काळात माणसं मारणं, त्यासाठी स्फोटकं, रसायनं वापरणं, एकट्या वा गटागटाने असणार्या मुस्लिमांना हजारोंच्या जमावाने मिळून जाळणं हजारोंचा जमाव ज्या 'सराईतपणे' करत होता, त्यावरुन या गोष्टी कशा आखीव आणि पद्धतशीर होत्या, हा मुद्दा ठसठशीतपणे पुढे येतो.
लवादासमोर आलेल्या हिंसाचाराच्या घटनांमधला स्थानिक राजकीय नेतृत्वाचा त्यातला सहभाग हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हल्लेखोरांपासून वाचवण्यासाठी मुस्लिमांनी केलेल्या मदतीच्या मागणीकडे तर दुर्लक्ष करण्यात आलंच, शिवाय भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा दंगलीत सक्रिय सहभाग होता, असंही आयोगासमोर आलं आहे. गोधर दुर्घटनेतले मृतदेह जिल्हा प्रशासनाचा विरोध असतानाही अहमदाबादमध्ये आणणं, बचावाच्या विनंतीची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी दखलही न घेणं, हल्ल्याचं नेतृत्व करणं, दंगल सुरु असताना त्या भागात नेतृत्वाने व्ही फॉर व्हिकटरीची खूण दाखवत फिरणं, या संदर्भातले तपशील पुस्तकात नावांसह पुढे येत जातात. सत्ताधारी राजकीय पक्ष आणि त्यांच्या सहकार्यांचा दंगलीतला उघड सहभाग हे या दंगलीचं सर्वात भयाण वास्तव होतं.
राजकीय नेत्यांप्रमाणेच या दंगलीत पोलिसांची भूमिकाही उघडुघड हिंसाचाराच्या बाजूने राहिली. कायदा आणि सुव्यवस्थेचे पाईक असलेल्या पोलिसांनी दंगल आटोकयात आणण्याचे प्रयत्न तर केले नाहीतच, उलट काही ठिकाणी दंगलखोरांना मदत केली. घटना घडून गेल्यानंतर अनेक तासांनी त्या ठिकाणी पोहोचणं, 'काहीच करायचं नाही, अशा वरुन ऑर्डर्स आहेत' असं मुस्लिमांना सांगणं, दंगलग्रस्त जमावाची दिशाभूल करुन त्यांना हल्लेखोरांच्या तावडीत पाठवणं, आपल्या गणवेषावरचे नावाचे बिल्ले काढून दुसर्या पोलीस चैकीच्या हद्दीत जून अत्याचार करणं, गुन्ह्यांची नोंद करण्यात हयगय या संदर्भातले तपशील नावं-ठिकाणं यांच्यासह समोर येत जातात.
यानंतरचा या दंगलीबाबतचा महत्त्वाचा घटक होता-आत्याचारांची पद्धत. लहान मुलींपासून वृद्ध स्त्रियांपर्यंत झालेले बलात्कार, पेटरेल, डिझेल-रॉकेल ओतून जाळणं, तलवारीने चिरणं, विशिष्ट रासायनिक पावडरीचा वापर, विद्युतप्रवाह सोडून मारणं, घरं नष्ट करण्यासाठी सिलिंडरचा स्फोट... हे सगळं सुरु असताना सिलिंडर, पेटरेल, रॉकेल घेऊन पुरवठा करत फिरत असणार्या गाड्या, कार्यकर्ते, त्यांच्याकडे मुस्लिमांच्या विभागवार याद्या तयार असणं, ठरवून मुस्लिमांच्या मालमत्तेचा नाश करणं, या सगळ्यासाठी एकाच वेळी दोन-तीनशेपासून हजारोंचा जमाव जमणं या सगळ्याच गोष्टी दंगली नियोजित आहेत याचंच निदर्शक आहेत. हल्लेखोरांनी वापरलेल्या तलवारीही विशिष्ट कंपनीच्या होत्या, असाही उल्लेख लवादाने केला आहे.
या अहवालातून पुढे आलेले आणखी दोन मुद्दे म्हणजे मध्यमवर्गांचा दंगलीतला सहभाग. छोटे उद्योजक, व्यावसायिक अशी मंडळी तर सहभागी झालीच, शिवाय काही प्रमाणात उच्चमध्यमवर्गीय स्त्रियाही या कृत्यांमध्ये सहभागी झाल्या होत्या. मुख्य म्हणजे या दंगलींमध्ये स्थानिक आदिवासींनीही भाग घेतला होता. स्त्रिया, आदिवासी जमाती या संदर्भातल्या 'इंडिकेटर'च मानता येतील.
दंगलीच्या काळात कमी-आधिक फरकाने दंगलीबाबतचे तपशील प्रसिद्ध झाले होते. पण 'गुजरात पॅटर्न'च्या पहिल्या भागातून ते एकात्रितरीत्या आणि अधिक प्रखरपणे आपल्यापुढे येतात. त्यामुळे पुस्तकातला दुसरा भाग त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचा ठरला आहे, कारण हा भाग गुजरात पॅटर्न नेमका काय आहे ते ठसठशीतपणे आपल्या पुढे ठेवतो. गुजरात दंगलीतून दिसणारे टरेंड आणि त्यामागची पूर्वतयारी हा सगळा भाग मुळातूनच वाचणं आवश्यक आहे. जवळपास पाचशे पानांचा हा अहवाल प्रमोद मुजुमदार यांनी मराठीत संक्षिप्त रुपात आणताना अधिक नेमका आणि परिणामकारक केला आहे.
या दंगलीत मुस्लिमांचा वंशविच्छेद करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याबद्दल संबंधितांना शिक्षा झाली पाहिजे या निष्कर्षापाशी हा अहवाल थांबतो आणि पुस्तक संपतं.
आपल्यापुढचे प्रश्न तिथून सुरु होतात...
वैशाली चिटणीस
|
 |
 |
|