|
सिनेमातली माणसं
Author: अनुराधा औरंगाबादकर
Publisher: साकेत प्रकाशन
|
|
Price: $10.66 $8.52 20% OFF ( ~315 Pages, R350)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: दिव्यमराठी ६ एप्रिल २०१४ वलयांकित गुंता -- अमित दीक्षित अनुराधा औरंगाबादकर यांनी सिनेमा आणि सिनेकलावंत यांच्याबद्दल आकर्षण असणा-या सिनेप्रेमींसाठी लिहिलेले सिनेमातली माणसं हे पुस्तक वैशिष्ट्यपूर्ण आहे. सिनेमातील माणसं उघडण्यापूर्वी या सदरात पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखिकेने, लेखन कारकीर्द आणि पुस्तक लिखाणाविषयीचा कार्यकारणभाव स्पष्ट केला आहे. तसेच लेखन क्षेत्रातील त्यांचे पदार्पण व पुस्तकाच्या निर्मितीचे श्रेय आणि सिनेकलावंतांचे व्यक्तिमत्त्व उलगडण्याकरिता त्यांच्या चित्रपटांची यादी न देता व्यक्तिमत्त्व उलगडण्यावर दिलेला भर व वाचकांच्या अपेक्षा याबद्दल माहिती दिली आहे. मात्र पुस्तकात लेखिकेने घेतलेल्या एकूण २२ सिनेकलावंतांच्या मुलाखती एका वेगळ्या शैलीत मांडण्याचा लेखिकेचा प्रयत्न फसला आहे. एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास व पोहोचल्यानंतर कलावंताच्या घराचे, आजूबाजूच्या परिसराचे वर्णन हे लेखनशैलीचा एक भाग म्हणून वाचकांना खिळवून ठेवू शकते. परंतु या पुस्तकात सभोवतीच्या वर्णनातच लेखिका रममाण झालेली दिसते. त्यामुळे त्या व्यक्तिमत्त्वाचे इतर पैलू वाचकांसमोर आणण्याचा मूळ उद्देश बाजूला राहून प्रवासवर्णन वाचत आहोत की काय, असे वाटत राहते. या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेबाबत लिहायचे झाल्यास, देव आनंद नावाचं उत्साही पाखरू ते तबस्सुम : एक हसरे फूलपर्यंत जो मुलाखतींचा क्रम आहे, त्याचे एक तर व्यक्तीच्या स्वभावानुसार किंवा कालखंडानुसार वर्गीकरण करायला हवे होते. यामुळे वाचकाला आपल्या लाडक्या कलावंतांना जाणून घेण्याचा सोपा मार्ग गवसला असता. परंतु लेखिकेने अनुक्रमणिकेत विशेषणांचा वापर करून सिनेमातील माणसांचा स्वभाव व्यक्त करण्याचा केलेला प्रयत्न हा कधी कधी व्यक्तिगत होत गेलेला आहे. त्याचमुळे कदाचित पृथ्वीचं स्वप्न, प्राजक्ताचं झाड या शीर्षकांमुळे ही मुलाखत कोणत्या व्यक्तीची आहे, याचा सहज अर्थबोध होत नाही. सिनेसृष्टीतील माणसांबद्दल वाचकांच्या मनात कायम त्यांच्या आयुष्यात डोकावण्याचे कुतूहल असते. अशा वाचकाने जर हे पुस्तक वाचले, तर त्या वाचकाला नवीन व्यक्ती किंवा सिनेमातील माणसांच्या बाबतीतील नवीन पैलू, स्वभाव, अनुभव, किस्से, त्यांचे जीवन यांची माहिती न मिळू शकल्यामुळे एका बाजूला हे पुस्तक वाचकांच्या अपेक्षा पूर्ण करत नाही. मात्र, दुस-या बाजूला जॉनी वॉकर, नलिनी जयवंत, राजकुमार, सज्जाद हुसेन, देवेन वर्मा यांच्या मुलाखती जमून आल्यामुळे लेखिकेचे कौतुकही करावेसे वाटते. सिनेजगतात एक काळ असा आला होता, की बरेच नायक, अभिनेते त्यांची हीरोगिरी सोडून हास्यभूमिकांकडे वळताना दिसल्यावर देवेन वर्मांनी केलेले भाष्य असे की, एकाच माणसाला किती गोष्टी जमणार? आधीच नायकाला नाचता यावं लागतं, मारामा-या करायला याव्या लागतात, बंदुकी चालवता याव्या लागतात! नायक करणार तरी किती कामं? यामुळे देवेन वर्मा हे व्यक्तिमत्त्व वाचकांसमोर उलगडण्यास मदत होते आणि यावर दिलेला सल्ला असा की, आयुष्यात तुम्ही ज्या घोड्यावर बसाल, त्यावर बसूनच चालत राहा, तरच शेवटपर्यंत पोहोचाल. नाहीतर सगळी घोडी तुम्हाला आपटून टाकतील, याचं भान ठेवायला हवं. यामुळे कामावरची त्यांची श्रद्धा आजही कायम आहे, हे दिसून येते. भारतीय शास्त्रीय संगीत, मेंडोलिन या वाद्यावर हुकूमत असलेले प्रख्यात संगीतकार सज्जाद हुसेन यांची मुलाखत लिहिताना सांगितलेले किस्से, आठवणी, अनुभव यामुळे सज्जाद हुसेन मनात घर करून राहतात आणि जवळचे वाटतात. मेंडोलिन या वाद्याच्या रंगामुळे झालेल्या अॅलर्जीचा त्यांच्या रियाजावर न होणारा परिणाम आणि जवळ असलेल्या अनेक मेंडोलिनपैकी नक्की कोणत्या मेंडोलिनच्या रंगामुळे अॅलर्जी झाली, हे शोधत बसण्यापेक्षा स्वत:चा रियाज सुरू ठेवावा, ही त्यांची जिद्द आणि निष्ठा आपणास दिसून येते. असे व्यक्तिगत बारकावे, सिनेमातील माणसांचा जगाकडे, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यक्त होत असतानाच, प्रत्यक्षपणे व्यक्तीसुद्धा उलगडत जाते. आजकाल नोकरी करणारी स्त्री ही करिअर-करिअर म्हणत संसारापेक्षा नोकरीला महत्त्व देताना दिसते. कारण घर चालवण्यासाठी नोकरी करणे आवश्यक ठरते. अशा परिस्थितीत श्रीदेवीसारख्या दीर्घकाळ हिंदी चित्रपटसृष्टीतील राणीपद उपभोगलेल्या अभिनेत्रीने मुलाखतीदरम्यान दिलेला कुटुंबाकडे लक्ष देण्याचा सल्ला हा खूपच बोलका आहे. ती म्हणते, चित्रपट करत होते तेव्हा तिकडे लक्ष दिले. आता संसार करताना संसाराकडे लक्ष देते. एकत्र राहावं, हिंडावं, फिरावं, कुटुंबासाठी वेळ द्यावा... अशा काही मुलाखती वाचताना लेखिकेचा सिनेमातील माणसं लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न यशस्वी होत असताना दिसतो. सिनेमातील माणसांच्या आयुष्यातील घटना, आठवणी, किस्से, त्यांच्या यशापयशामागचे गमक, त्यांचे माणूसपण, त्यांचा राग-लोभ, त्यांची स्वप्ने सर्व काही सिनेमातली माणसं या पुस्तकात वाचायला मिळतात. पण ते वाचत असताना वाचक त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात गुंतण्यापेक्षा, लेखिकेच्या व्यक्तिगत विचारात आणि त्यांना भेटताना आलेल्या अडचणींच्या प्रस्तावनेत, व्यक्तींच्या घराच्या वर्णनात आणि समाजाची त्या व्यक्तीबद्दलची प्रतिमा यातच गुंतून राहतो.
Other Links:
|
 |
 |
|