|
यमुनापर्यटन
Author: बाबा पदमनजी
Publisher: स्नेहवर्धन प्रकाशन
|
|
Price: $2.92 $2.33 20% OFF ( ~122 Pages, R60)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: "यमुनापर्यटन अथवा हिंदुस्तानातील विधवांच्या स्थितीचे निरूपण" मराठीतील पहिली कादंबरी म्हणून 'यमुनापर्यटन'चा उल्लेख केला जातो. बाबा पदमनजी यांनी १९५७साली जेव्हा ही कादंबरी लिहिली तेव्हा त्यांच्या दृष्टीसमोर ख्रिस्ती धर्माचा प्रसार हा हेतू होता, तसेच हिंदुधर्मातील अनेक त्रुटी दाखवून लोकमत जागृत करण्याचाही उद्देश होता. प्रयायाने धर्मप्रसार हे प्रधान उद्दिष्ट असल्यामुळे बाबा पदमनजी यांनी तत्कालिन हिंदु समाजातील चालीरीती विशेषत: उच्चवर्णीय हिंदूंची प्रवृत्ती, स्त्रियांकडे, विशेषत: विधवा स्त्रीकडे बघण्याची दृष्टी, लोकनिंदेला घाबरून जाण्याची वृत्ती, समाजाला सामोरे जाण्याची अक्षमता अशा विविध गोष्टी नजरेपुढे आणून 'यमुनापर्यटन' या कादंबरीची रचना केली. 'यमुनापर्यटन'मध्ये बाबा पदमजी यांनी ब्राम्हण आणि मराठा समाजातील विधवा स्त्रियांची स्थिती किती दु:खदायक होती हे दाखवण्यासाठीच नायिकेला महाराष्ट्रातील अनेक गावांचा प्रवास घडविला आहे. प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सुखाचा जीवनमार्ग दाखवणारा एकच मार्ग म्हणजे ख्रिश्चन धर्माचा स्वीकार, हे जणू ध्येय ठेवूनच विनायकाच्या मृत्यूनंतर यमुना 'शरीराच्या रक्षणासाठी आणि आत्म्याच्या कल्याणासाठी' एका ख्रिश्चन माणसाशी पुनर्विवाह करते; असे या कादंबरीत शेवटी दाखविले आहे. अर्थात धर्मप्रसार हा बाबा पदमनजींचा प्रधान हेतू या कादंबरीलेखनामागे असला तरीही समकालीन उच्चवर्गीय कुटुंबातील विधवा स्त्रियांचे एक वास्तव चित्रण त्यांनी केलेले आहे, हे जराही नाकारता येणार नाही. या दृष्टीनेच या कादंबरीचे 'हिंदुस्तानातील विधवांच्या स्थितीचे निरूपण' हे उपशीर्षक लक्षणीय व महत्वाचे आहे. मराठी भाषेतली कादंबरी लेखनाची सुरुवात अशा रीतीने समाजदर्शनाने, समाजाबाबतच्या लेखकाच्या काही एका चिंतनात्मक अभिप्रायाने झालेली आहे, हेही मुद्दाम ध्यानात घेण्यासारखे आहे. मराठीतली पहिलीच कादंबरी वास्तववादी होती हे नमूद करायला हवे.
Maharashtra Times Review
|
 |
 |
|