|
कौमार्यातील मानसछटा
Author: संजय पुराणिक
Publisher: नीहारा प्रकाशन
|
|
Price: $2.39 $1.91 20% OFF ( ~100 Pages, R50)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: प्रहार ९ नोव्हेंबर २०१४ कौमार्यातील मानसिक वादळ -- रमेश पांचाळ पौगंडावस्थेमध्ये मुलांच्या अनेक शारीरिक बदल होत असतात आणि त्या बदलांचे परिणाम मानसिक, भावनिक, तसेच सामाजिक अशा सर्वच दृष्टिकोनातून मुलांवर होत असतो. या परिस्थितीत या वयामध्ये होणा-या बदलांना तेवढाच संयमी आणि प्रेमाने हाताळण्याची गरज असते. मुलांचे भावविश्व समजून घेत त्यांना आपुलकीने योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे असते. सर्व गोष्टींचा विचार करून लेखकाने मुलांचे भावविश्व उलगडून दाखविण्यासाठी, या पुस्तकात विविध विषयांवर सहा एकांकिकांची गुंफण केली आहे. "खरं तर वडिलधा-यांचा आपल्या मुलांवर जबरदस्ती करण्याचा अट्टाहास अयोग्यच. मानवी मनाला जे भावतं, जे मनापासून करावंसं वाटतं, तेच त्याचं ध्येय असलं पाहिजे व ते त्याला करू द्यावं. आपण फक्त त्याच्या मार्गातल्या अडचणी दूर करण्याचा व त्याला योग्य मार्गावर राखण्याचा सतत प्रयत्न करावा. आपले विचार त्यांच्यावर लादून काहीच साध्य होत नाही. जिथं मन रमतं तिथेच भविष्याचं दार उघडतं. पण हे पालकांना समजावं कसं? समजलं तरी मानावं कसं?" प्रस्तुत उतारा संजय श्रीपाद पुराणिक लिखित कौमार्यातील मानसछटा या एकांकिका संग्रहातील आहे. सदर पुस्तकामध्ये लेखकाने सहा एकांकिका लिहिल्या आहेत. या सर्व एकांकिकांचा आत्मा किशोरावस्था हाच आहे. पौगंडावस्थेमध्ये मुलांच्या अनेक शारीरिक बदल होत असतात आणि त्या बदलांचे परिणाम मानसिक, भावनिक, तसेच सामाजिक अशा सर्वच दृष्टिकोनातून मुलांवर होत असल्याचे आपण पाहतो. बाल्यावस्थेतून तारुण्यावस्थेकडे प्रवास करत असताना प्रत्येक मुलाच्या आयुष्यात येणारा एक अपरिहार्य असा हा टप्पा असतो. याच टप्प्यात शरीरामध्ये होणा-या संप्रेरकांच्या वादळाचे पडसाद मुलामुलींच्या भावजीवनावर उमटतात आणि त्याचा परिचय आपल्याला मुलामुलींच्या वागण्या-बोलण्यामधून येत असतो. या टप्प्यामध्ये मुलांचे पूर्ण भावविश्वच बदलून जाते आणि त्यातून अनपेक्षित असा भावनिक, सामाजिक व सांस्कृतिक गुंता तयार होतो, असे या पुस्तकाचे प्रस्तावनाकार, बालरोगतज्ज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर यांना वाटते. या वयामध्ये होणा-या बदलांना तेवढाच संयमी आणि प्रेमाने हाताळण्याची गरज असते. मुलांचे भावविश्व समजून. घेऊन त्यांना आपुलकीने योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे असते. मुलांशी मित्रत्वाने वागणे आवश्यक असते. मुलांच्या अनाकलनीय विचारांनी भरकटत जाणारे त्यांचे आयुष्यरूपी जहाज योग्य किना-याला लावण्यासाठी संयमी पालकांची आवश्यकता असते. पालकांनीही मुलांचे मानसशास्त्र समजून घेणे व त्याप्रमाणे आपल्या वागण्यात बदल करणे आवश्यक असते. या सर्व गोष्टींचा विचार करून लेखकाने मुलांचे भावविश्व उलगडून दाखविण्यासाठी नाटक या माध्यमांचा आधार घेतला असून मुले आणि पालक यांच्यामधील संवाद त्यातील भाष्य वाचकांना सांगण्यासाठी विविध विषयांवर सहा एकांकिकांची गुंफण केली आहे. मुलगी म्हणजे परक्या घरी जाणारी. त्यामुळे अभ्यासासोबत तिने घरची कामे करणे आवश्यक आहे. घरी भाऊ असेल त्याला अतिशय प्रेमाची वागणूक तर मुलींना मात्र नेहमी आई-बाबांचा मार खावा लागतो. मुलगा हा वंशाचा दिवा त्यामुळे त्याचा सर्व दुर्गुणांकडे दुर्लक्ष करण्याची पालकांची प्रवृत्ती व त्यामुळे पौगंडावस्थेतील मुलींच्या मनावर उमटणारी लिंगभेदामधील दाहकता लेखकाने मुलीची जात या एकांकिकेमध्ये दाखवली आहे. तर कंटाळा या एकांकिकेमध्ये अभ्यासाचा कंटाळा करणा-या मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध गोष्टींचा आधार घेऊन मुलांच्या मनावर अलगदपणे फुंकर घातली आहे. थोडं आमचंही ऐका या एकांकिकेमध्ये आपल्या आवडीचं करियर करायचं असं मुलांनी ठरवलेलं असेल तर पालकांनी त्यात व्यत्यय आणू नये व त्यासाठी मुलांनी दुसरं करियर निवडावं अशी जबरदस्ती करू नये त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. परंतु मुलांच्या आवडीच्या करिअरच्या दृष्टीने जर त्यांना योग्य मार्गदर्शन केलं तर मुलं त्यासाठी जोमाने तयारी करतात व यशस्वी होतात असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपली शक्ती आपणच या एकांकिकेमध्ये मुली अभ्यासामध्ये हुशार असूनही घरातील मुलांप्रमाणे मुलींना स्वातंत्र्य दिले जात नाही. मुलांना इंग्रजी शाळेत तर मुलीला मराठी शाळेत घातले जाते. हा भेदाभेद करण्यामध्ये पुरुष कमी, पण बायकाच जास्त असतात. या सर्वाचा परिणाम म्हणून तिच्या मैत्रिणी एके दिवशी घरून पळून दूर गावी जातात आणि रात्र होते. ज्या घरी जायचे असते ते घर बंद असल्यामुळे रात्री त्यांना घराबाहेरच बसावे लागते. परंतु लेखकाने या मुलींना समर्पक भाषेत समजावण्यासाठी, तुम्ही चुकता आहात हे सांगण्यासाठी त्यांच्या वयाच्या एका मुलीचा आत्मा त्या मुली झोपेत असताना खूप समजावतो, असं दाखवलंय. त्यासाठी वेगवेगळ्या उदाहरणाचा वापर लेखकाने केला आहे. तर मी नकोशी या एकांकिकेमध्ये आपली ही मुलगी आहे म्हणूनच तिची मोठी जबाबदारी आहे. हे परक्याचं धन आहे. त्याला जिवापाड जपून त्यांच्या हक्कांच्या घरी पाठवणं हे आपलं कर्तव्य आहे असा कुजकट विचार करणारा मुलीचा एक सुशिक्षित बाप आपल्याला पाहावयास मिळतो. अज्ञान अवस्थेमध्ये लग्न लावू नये, असा कायदा असतानाही बुरसटलेल्या विचारांची माणसे मुलींच्या स्वप्नांचा चुराडा करताना आपण आपल्या आजूबाजूच्या समाजामध्ये पाहत असतो. त्याचं विदारक वास्तव लेखकाने मांडले आहे. यातील मुलीचे संवाद वाचताना संवेदनशील माणसांचे डोळे पाणावले नाहीत तरच नवल! संजय श्रीपाद पुराणिक हे स्वत: हाडाचे शिक्षक असल्याचे आपल्याला वेळोवेळी जाणवते. त्यांनी वापरलेली भाषा अतिशय सरळ आणि संयत आहे. कुठेही क्लिष्टपणा नाही. व्यक्तिरेखांच्या संवादाच्या माध्यमातून त्यांची भाषा फुलत जाते आणि पुस्तक वाचतानाही आपल्या नजरेसमोर प्रत्यक्ष नाटक पाहत असल्याचा आभास निर्माण होतो. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेतून अनुदान मिळालेले आहे. लेखकाने आई, बाबा, मुलगी, मुलगा, भाऊ, बहीण, मैत्रीण इत्यादींच्या माध्यमातून संवादनिर्मिती केलेली असली तरी हे पुस्तक वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे या पुस्तकात केवळ आणि केवळ मुलींच्या कौमार्यातील मानसछटा दाखवल्या आहेत. वस्तुत: आज आपल्या सभोवताली नजर टाकली तर व्यसनाधिनतेपासून ते हत्या इत्यादीसारख्या क्रूर घटनांमध्ये याच वयातील तरुणांचा (मुलांचा) सहभाग जास्त वाढत असल्याचे आपणास जाणवते. या वयात मुले ही मुलींपेक्षा अधिक आक्रमक होताना आपण पाहतो त्यामुळे एखाद्या मुलाची मानसछटाही एखाद्या एकांकिकेमध्ये साकारली असती तर अजून बरे वाटले असते, पण असे जरी असले तरी या नाजूक विषयाला हात घालण्याचे धाडस लेखकाने दाखविले आणि तेवढाच ताकदीने या वयात निर्माण होणारे प्रश्न आणि त्यावरील उपाय यांची सांगड समर्पकतेने केलेली आहे. इंग्रजी भाषेमध्ये विषयावर खूप साहित्य निर्माण झालेले असले तरी मराठीमध्ये मात्र-फारक कमी साहित्यिकांनी या विषयाला हात घातला आहे. त्यामुळे मुले आणि पालक यांच्या डोळ्यात एक प्रकारचे अंजन घालण्याचे काम या पुस्तकाने नक्कीच केलेले आहे. प्रत्येक पालकाने हे पुस्तक आवर्जून वाचावे तसेच प्रत्येक शाळेतील ग्रंथालयात हे पुस्तक वाचनासाठी ठेवावे एवढी या पुस्तकाची उपयुक्तता आहे. समाजप्रबोधनासारखं खूप महत्त्वाचं काम या पुस्तकाच्या रूपाने संजय पुराणिक यांनी केलेलं आहे यात शंकाच नाही.
Other Links:
|
 |
 |
|