|
काचाकवड्या
Author: राजन गवस
Publisher: स्पर्श प्रकाशन
|
|
Price: $5.14 $4.11 20% OFF ( ~187 Pages, R150)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: ई-सकाळ रविवार २१ मे २००६ सामाजिकता जपणारे लेखन ( डॉ. माधवी खरात )
"काचाकवड्या' - हा राजन गवस यांनी लिहिलेला लेखसंग्रह. एकूण पाच भागांत, अंधश्रद्धा, रूढी परंपरा, जातीयता, देवदासी निर्मूलन, अडचणी, दारिद्यर, अशा विविध सामाजिक प्रश्नांच्या अनुषंगाने हे लेखन झालेले आहे. खेड्यापाड्यातील, तळागाळाच्या समाजातील "माणूस' हा लेखनाचा केंद्रबिंदू आहे. पहिल्या भागात जंगलातील वाड्यापाड्याचे, गिरिजनांच्या दरिद्री आयुष्याचे रेखाटन आहे. मधावर, वन्य पशू-प्राण्यांच्या शिकारीवर गुजराण करणारी माणसं, बेरड समाजातील बब्या, नवर्याच्या माराने जबरदस्तीने, इच्छा नसूनही चोरी करणारी, तुरुंगात जाणारी गिरधा, भुकेनं हाडाडलेली वस्तीवरची मुलं इ. लेख आहेत.
दुसर्या भागा गावाकडची माणसं, त्यांचं चाकोरीबद्ध आयुष्य, सामान्य जीवनातील वैविध्य इथं प्रकट केलेलं आहे. खेळ्यातल्या जीवनात बैलाचं असणारं असाधारण महत्त्व, कुटुंबाला लागलेला लळा आणि त्याची अस्वस्थ अखेर, देवाचा भगत असलेला निंग्या, मंदिरातील बसवण्णाच्या मूर्तीशी त्याचा होणारा संवाद, त्याचा भावनातिरेक आणि शेवट (पृ. ४७) कविताच बोलणारी, प्रासादयुक्त बोलीभाषेत गोष्टी सांगणारी, सार्या गावाला वळण लावणारी सखूआजी (पृ. ४८) झाडापाल्याचा दवा देणारा वनौषधीचा जाणकार, पण उपेक्षित धनगर इ. गावांशी निगडित व्यक्तिचित्रे या भागात आहेत. सामान्य माणसातला भावबंध खेळ्यातील समूह जीवनाचे स्वरूप स्पष्ट करतो.
काचाकवड्याचा तिसरा भाग एका ज्वलंत प्रश्नाशी वाचकांना खिळवणारा आहे. देवदासी या परंपरागत प्रथेचं भयंकर रूप, त्यातून उद्भवणारे सामाजिक प्रश्न, देवदासीचे भोगदासी होणे, तिच्यातील भयगंड... न्यूनगंड... गळ्यातील दर्शनाने (पृ. ६२) तिच्यात निर्माण केलेलं मानसिक दौर्बल्य, यांसारख्या प्रश्नांचा ऊहापोह यात केला आहे. देवदासी निर्मूलन परिषद, जटामुक्ती कार्यकर्त्यांची हतबलताही इथं स्पष्ट केली आहे. देवदासी निर्मूलन - जटामुक्तीसाठी प्रबोधन, आवाहन करणारे कार्यकर्ते, "आमच्या पोटाचे काय?' या देवदासींच्या प्रश्नांना उत्तर देताना हतबल होतात आणि चळवळ वेगाने मागे येते, हा गंभीर प्रश्न अंतर्मुख करणारा आहे.
चौथ्या भागात ग्रामीण - शहरी भागातील अंधश्रद्धा जागतिकीकरण - शहरीकरणाच्या, यंत्रयुगाच्या शतकात - काळातही समाजाला कशी ग्रासते इ. चिंतन आहे. बदलत्या ग्रामीण समाजाचा वेध पाचव्या भागात मांडलेला आहे. शिक्षण, भौतिक सुधारणांचा ग्रामीण भागात झालेला परिणाम, मूल्यांची होत असलेली पडझड, पैसा हेच जीवनमूल्य मानणारा श्रममूल्यांपासून दुरावलेला ग्रामीण तरुण, नोकरीअभावी आलेले वैफल्य, याचबरोबर खेड्यात पोचलेल्या सहकार संस्था, तेथील राजकारण, पाटबंधारे प्रकल्पाने नष्ट होणारी जंगले आणि रानोमाळ धावणारे गिरिजन, धनगर असे हरवलेल्या खेड्याचे चित्र या भागातून स्पष्ट होते.
शिक्षित ग्रामीण तरुणाचे शहरातील जीवनाशी जुळवून घेतानाची मानसिकता नेमकेपणाने मांडली आहे. कुटुंब, गाव समाजाबाबतची त्याची ओढ, त्याचा तुटलेपणा आणि अपराधित्व हे वास्तव चित्र आहे.
एकूणच "काचाकवड्यातून' तळागाळाच्या माणसाच्या जीवन जाणिवा - त्याचे जगणे-मरणे, त्याचा संघर्ष - सामंजस्य त्याचे दारिद्यर - अज्ञान इ.बाबतचे चिंतन आहे. माणसाचे निसर्गाला ओरबाडणे (१४१).
गांधीजींच्या मूलोद्योगी शिक्षणाची टवाळी केल्याची भोगावी लागणारी फळे (१३१), जंगली जनावरांचा प्रश्न (१३९), गावचं हरवलेलं गावपण (पृ. १६१) यांसारख्या प्रश्नांमुळे येणारी अस्वस्थता इथे जाणवते.
स्वतंत्र भारतात, पन्नास वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही माणसाला "माणूसपणाच्या' हक्कापासून वंचित राहावे लागते, ही अस्वस्थता अंतर्मुख करणारी आहे. देखणे मुखपृष्ठ, समर्पक शीर्षक - पुस्तकाचे मोल वाढविणारे आहे.
|
 |
 |
|