|
ज्ञप्ति उन्मेष - भक्ताचे भावाविष्कार
Author: चारुशीला वडगावकर
Publisher: संस्कार प्रकाशन
|
|
Price: $4.28 $3.42 20% OFF ( ~100 Pages, R125)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: लेखिकेचे मनोगत ... ओवीबध्द 'ज्ञानभक्तियोग' ही पोथी विजयादशमी शके १९३५ (१३ ऑक्टोबर २०१३) या दिवशी विद्वान रामदासी श्री. मकरंदबुवा यांच्या हस्ते प्रकाशित झाली. त्यांनी 'ज्ञानभक्तियोग' या पोथीवर आत्मतुष्टिदायक सुंदर प्रवचन केले. या पोथीस श्रीज्योतिर्भास्कर श्री. जयवंतराव साळगांवकर, विद्यावाचस्पति श्री. शंकर अभ्यंकर व न्यायमूर्ति श्री. श्रीराम देशपांडे यांची प्रस्तावना लाभली आहे. 'ज्ञानभक्तियोग' पाठोपाठ 'ज्ञप्ति उन्मेष' हा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. परमेश्वराच्या ध्यासापायी प्रेमाने झपाटले गेल्याने अनेक संतांच्या मुखातून कवने, दोहे, भजने स्रवली आहेत. तसेच ज्ञानप्राप्तीनंतर संतांमधून उपदेशात्मक भजने प्रसवली आहेत, हे सर्वज्ञात आहे. त्याप्रमाणे या काव्यसंग्रहात परमेश्वराच्या भेटीसाठी आतुरलेल्या मृदु, कातर, हळव्या अंत:करणातून स्फुरलेली कवने, भजने आहेत. तसेच नंतर उपदेशात्मक, प्रसंगोपात्त, ज्ञानातून फुलून आलेली कवने, भजने आहेत. ही सर्व काव्ये त्यांच्या जन्मानंतर जवळ जवळ ३०-३२ वर्षांनी प्रकाशित होत आहेत. ती मध्यरात्री, पहाटे, दिवसाच्या कोणत्याही प्रहरी स्फुरली आहेत. 'ज्ञप्ती' ही नाममुद्रा श्रीगुरुंनी मला दिली आहे. ज्ञप्ति म्हणजे शुध्द ज्ञान, म्हणजे काम, क्रोध, राग, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंना जिंकून पूर्ण वैराग्य लाभल्यानंतर, परमेश्वर प्राप्तीसाठी, भगवत्प्रेमाने चिंब भिजलेल्या अंत:करणात, सद्गुरुंचा ज्ञानोपदेश रुजल्यावर, जो विलक्षण अनुभव येतो, तो म्हणजे मन, बुध्दीचा लोप होऊन, देहाची जाणीव नष्ट होऊन, निराकार, नि:शब्द, निर्गुण, आनंदमयी ज्ञानस्वरुप अवस्था उरते, तिला परब्रह्मस्वरुपिणी ज्ञप्ति म्हणतात. ती संपूर्ण विश्वाच्या मागे अलिप्तपणे उभी राहून विश्वापलिकडेही अनंत रुपाने स्थित आहे. ज्ञप्तीतून उंचबळून ज्ञानभक्तिपूर्ण बाहेर उडालेले तुषार म्हणून श्री गुरुंनी या काव्यसंग्रहाचे नाव 'ज्ञप्ति उन्मेष' अर्थात 'भक्ताचे भावाविष्कार' असे ठेवले आहे. काव्ये तारखेनुसार लावलेली नाहीत. मागे-पुढे आहेत. मूळ भागवताच्या (श्रीकृष्ण चरित्र असलेल्या) दशम स्कंधावर संत बहिरा जातवेदांनी 'भैरवी टीका' हा मोठा ग्रंथ लिहिला. तो वाचताना त्यावर मला स्फुरलेल्या ओव्या 'भैरवी स्तुती' या नावाने यात आहेत. ह.भ.प. श्री जागेश्वर वामनराव पात्रीकर यांचा 'श्री दादाजी विजय' ग्रंथ प्रथम वाचताना स्फुरलेल्या ओव्या 'श्री दादा विजय स्तुती' या नावाने यात अंतर्भूत केल्या आहेत. तसेच काही ओवीबद्ध लिखाण आहे. माझ्या आईस, मावशीस व एका जिज्ञासूस लिहिलेली पत्रे आहेत. जशी पंढरपुरी विठ्ठलमूर्ती आहे तशीच श्री. दादाजी महाराजांची समाधी खंडवा, मध्यप्रदेश येथे आहे. माझ्या जन्मापासून ज्या समाधीवर मी मस्तक ठेवीत आले ती समाधीच माझे सर्वस्व आहे, आराध्य दैवत आहे. त्यांच्याच कृपेने मला श्री सदगुरुलाभ होवून स्वत:चे स्वरुपदर्शन घडले. श्री. दादाजी महाराज विश्वव्यापक परब्रह्म आहेत. त्यांच्या कृपेने आज हा 'ज्ञप्ति उन्मेष' काव्यसंग्रह प्रसिध्द होत आहे. या ज्ञानभक्तिच्या वर्षावाने सर्वांना आत्मिक समाधान, शांती लाभो, अशी परमेश्वरास प्रार्थना करते. - सौ. चारुशीला वडगावकर, 'ज्ञप्ति' ============= सप्रेम नमस्कार "ज्ञप्ती उन्मेश" मधील काव्यामागील अर्थ समजण्या इतकी आध्यात्मिक जाणीव अंगी अजून बाणली नाही , मात्र त्यामागील भाव अतिशय मनोहर आहेत असे जाणवले. त्यातील उत्कटता व सहजता विलोभनीय आहे . मुमुक्षूंसाठी अगदी योग्य मार्गदर्शनही त्यात आहे . कविमनाला कधी कधी लग्नातील सनई चौघडा ऐकून तर कधी मशिदीतील, कधी बांग ऐकून , तर कधी गाडीचा धडधडाट ऐकून सत्यनारायण पूजास्थानी तर कधी चित्र रेखाटन करताना काव्य स्फुरते हे खर्या प्रतिभावंताचे लक्षण आहे हे जाणवते. गुरू परमात्मा परेशू हे गुरू महती वर्णनात्मक काव्यातून समजते गुरूच रक्षी | गुरूच साक्षी | कस्तुरीमृग गुरू हा चुंबक लोह शिष्यास आकर्षितो किंवा गुरुरूपी परिस शिष्यरूपी लोहास परीसच बनवतो याचा प्रत्यय दादाजींवरील काव्यातूनही येतो , त्याचबरोबर "इंद्रियांचा मेळा ऐसा | गेला परद्वारी | ज्ञप्तिरूप झाला |दादाजी कृपे आणि ध्यान करीता गुरुमाउलीचे विकल्प सर्व लयास गेले हा भाव समजतो. "अरे हे उदारा" मधील मागणे वाचून गीतेतील भक्तियोगात वर्णन केलेल्या भगवंतानी सांगितलेल्या लक्षणांची आठवण होते. तर "असे करू नि तसे करू" वाचताना मानवाच्या मनोरथांच्या निरर्थकतेची योग्य जाणीव होते. "मानवनिर्मित गाडी " मध्ये ज्ञानी व अज्ञानी यांच्यामधील भेद अचूकपणे पकडला गेला आहे. "मम हृदयी ओंकार प्रकटला", "मीरा नच ती चक्रपाणी", "गंगा यमुना" इ. अनेक काव्यातून शेवटी ईश्वर अंतरंगातच आहे याची जाणीव अचूकपणे पकडली गेली आहे. "करू प्रभू रे कशी स्वागता " मधील कल्पनाविलास अतिशय प्रशंसनीय आहे . ज्ञप्तीची मोक्षाची इच्छा किती तीव्र आहे हे "इच्छा एकची मनी वसे रे " मधून व्यक्त होते. "हसणाराही मीच असे " यावरून केनोपनिषदाची आठवण येते. अनेक शोध लावणार्या मानवाला खरा शोध कश्याचा घ्यायचा आहे हे "शोध मानवा" च्या आवाहनातून समजते. भक्तांना लिहिलेल्या पत्रातूनही काव्यातून व्यक्त झालेला संदेशच गद्यरूपात व अतिशय लाघवी स्वरात व्यक्त झाला आहे. "भैरवी स्तुती " वाचून त्या ग्रंथाचा मतितार्थ कळतो व तो ग्रंथ मुळापासून वाचावा असे वाटू लागले. अमेरिकेत राहत असल्यामुळे अभिप्राय देण्यास विलंब लागला याबद्दल क्षमस्व ! -- अण्णा (श्याम कुलकर्णी)
|
 |
 |
|