|
प्रश्नच प्रश्न आणि उत्तरं ?
Author: माधव गोडबोले
Publisher: श्रीविद्या प्रकाशन
|
|
Price: $7.61 $6.08 20% OFF ( ~210 Pages, R250)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: हे पुस्तक गोडबोले यांनी आजपर्यंत वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये, तसंच काही दैनिकांच्या पुरवणींसाठी लिहिलेल्या लेखांचं संकलन आहे. मात्र, यातला प्रत्येक लेख परखड आणि कुणाची बाजू घेणारा असा नाही, तर त्यांची बांधिलकी फक्त सत्याशी आहे, त्यामुळं ते दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची काही धोरणं कशी चुकीची होती आणि त्यातून सरकारी संस्थांची कशी हानी झाली, याचा तपशील देतात. त्याचबरोबर एका प्रकरणात ते माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची कार्यपद्धती कोळसा गैरव्यवहार रोखण्यात कशी अपयशी ठरली, याकडं भेदकपणे लक्ष वेधतात. आपली बदली होण्यासाठी कअॅंगेसचे दिवंगत नेते जवाहरलाल दर्डा कसे कारणीभूत ठरले, याचाही स्पष्ट उल्लेख करून, ते माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करून, दादांचा वेगळेपणा ठसेल असे किस्सेही सांगतात. यातल्या अनेक लेखांत त्यांनी सरकारी काम कसं चालतं, हे तर सांगितलं आहेच; पण त्यात सुधारणा कशी करता येईल, याचाही तपशील दिला आहे. या पुस्तकातल्या शेवटच्या प्रकरणात त्यांनी, उत्तरं आहेत; पण राजकीय इच्छाशक्ती आहे का ?, असा प्रश्न विचारत जे लिहिलं आहे, ते सगळ्यांनाच अंतर्मुख करायला लावणारं आहे. टोलचा गोंधळ अशा साध्या विषयापासून संसदीय व्यवस्था यासारख्या देशव्यापी आणि महत्त्वाच्या अशा अनेक विषयांना त्यांनी २८ लेखांतून हात घातलाय. सनदी अधिकार्यांनी राजकारणात यावं की नाही, त्याबद्दलची नियमावली काय असावी, याबद्दलही त्यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.
Other Links:
|
 |
 |
|