|
पुत्रवती
Author: सुरेखा शहा
Publisher: सुमेरु प्रकाशन
|
|
Price: $6.85 $5.48 20% OFF ( ~225 Pages, R200)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: ई-सकाळ शुक्रवार, ६ ऑगस्ट २००४ गतकाळात रमलेली कथा
काळ बदलतो तसं जीवन बदलत जातं. नवनव्या गोष्टींना आत्मसात करत समाज वेगळ्या वाटांनी जाऊ लागतो. तरीसुद्धा जुन्या दिवसांची साद मनात गुंजत राहते. आजच्या दगदगीच्या, यांत्रिकतेच्या आणि बाह्यात्कारी गोष्टींना महत्त्व असलेल्या जमान्यात पूर्वीच्या काळातला साधेपणा, विकासाच्या टप्प्यावरचा तेव्हाचा माहोल अजूनही गावाचा स्पर्श असलेली तेव्हाची मुंबीसारखी शहरं या गोष्टींचं माधुर्य मनावर ठसतं. विशेषत: कुटुंबातर्गत आणि समाजातील मानवी संबंधांच्या संदर्भात काल आणि आज, यातला फरक जाणवतो. एकत्र कुटुंबातले हेवेदावे, कुरबुरी सोडल्या तर त्या वेळच्या कौटुंबिक जीवनात किती प्रेम, जिव्हाळा होता; शिवाय समाजातही माणसं कशी एकमेकाला मदत करणारी होती याचं दर्शन सुखावून जातं. सुरेखा शहा यांची याच संदर्भाचा वेध घेणारी 'पुत्रवती' ही कादंबरी अलीकडेच प्रसिद्ध झाली आहे. १९२० ते १९४७ असा साधारण कालखंड यात अपेक्षित आहे.
गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या साहित्यप्रकारांमध्ये रमलेल्या या लेखिकेनं गेल्या वर्षी लिहिलेली 'जोहड' ही राजस्थानातील पाण्याच्या प्रश्नावर जोहड तलाव बांधून उत्तर शोधणार्या राजेंद्रसिंह यांच्या कार्यावरील कादंबरी गाजली होती. तिला अनेक पुरस्कारही लाभले. याच लेखिकेनं स्वातंत्र्यपूर्व काळाविषयीचं कुतूहल मनात ठेवून 'पुत्रवती' लिहिली आहे.
सोलापूरजवळच्या निंबर्गी गावातल्या देशपांडे कुटुंबाभोवती आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्ती- कुटुंबाच्या जीवनाभोवती विणलेली ही कादंबरी. देशपांडे कुटुंब हे इथलं प्रतिष्ठित कुटुंब आहे. गंगाबाई या विधवेच्या हाती त्याची सत्ता आहे. या कुटुंबातले सदस्य म्हणजे मुलं, सुना, नातवंडं यांच्यातील संबंध, दररोजच्या जीवनातलं घरगुती तपशील या निमित्तानं त्या वेळच्या गावगाडयाचे पुसटसे संदर्भ या बाबी पुढे ठेवत कादंबरी पुढे सरकते. या कुटुंबातला नातू गणेश शिकायला म्हणून पुण्याला जातो, तिथून स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतो. त्याचे वडील गोपाळराव कर्तेसवरते, कुटुंबप्रमुख आहेत. पण त्यांचा मधला मुलगा हरिभाऊ स्वकतरृत्वानं बांधकाम व्यवसायात पडतो आणि त्याची प्रचंड आर्थिक भरभराट होते. बायकोचे - आनंदीचे- दागिने गहाण ठेवून भांडवल उभारणार्या हरिभाऊंचा डामडौल बघता बघता वाढतो. ही सारी संपत्ती त्यांची स्वत:ची आहे. आनंदीचं महत्त्वही घरात वाढतं, पण तिच्या कष्टात, रोजच्या चाकोरीत फरक पडत नाही. हरिभाऊ व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर राहतात. मुंबीला बंगला, वाडी घेतात. त्यांच्यामुळे नवनव्या चिजा घरात येतात. ग्रामोफोनच्या तबकडया आनंदीच्या खोलीत वाजू लागतात. आनंदीचा इतर जण हेवा करतात. त्यातून तिला एकटेपणा येतोच. पण तिच्या एकटेपणाचं खरं कारण निपुत्रकत्व आहे. हरिभाऊ एकदा तिला नाशिकला डॉक्टर मडमेकडे नेऊन आणतात. तिच्यात दोष नाही, याचा निर्वाळा ती देते. हरिभाऊंना मुंबीच्या डॉक्टरला दाखवण्याचा सल्ला देते. त्यांना अर्थातच तो मानवत नाही. आपल्यात दोष निघाला तर काय, उगाच कशाला विषाची परीक्षा घ्या, या विचारानं गप्प बसतात.
आनंदीला विसूचा-पुतण्याचा लळा असतो. विसूला या मंडळींनी दत्तक घ्यावं अशी इच्छा त्याच्या ईला आणि आजीला असते. आनंदीचं 'वांझ' असणं, तिची त्यामुळे कुचंबणा होणं, तिच्या मनातील मातृत्व भावनेच्या कोंडमारा होणं याचं चित्रण कादंबरीत येतं. आनंदीच्या माहेरी, मोठा भाऊ सोनं तयार करण्याच्या मागे वेड झालेला. आपल्या मुलालाच आनंदीनं दत्तक घ्यावं ही त्याची इच्छा. एका वळणावर आनंदी हट्टाने तेच करते आणि फसते. हरिभाऊ या घटनेनंतर आनंदीपासून मनानं दूर जातात. शरीरानं विकलांग होतात. त्यांच्या मृत्यूनंतर भाऊ आनंदीला खूप लुबाडतो. या प्रसंगी मदतीला धावून येतो, आता मोठा होऊन वकील झालेला विसू. विसूमुळे या दत्तकपुत्राचा प्रश्न निकालात निघतो आणि भावाला थोडे पैसे घेऊन आनंदी दत्तकपुत्र रद्द करून घेते. विसू तिला मुंबीला घेऊन येतो. स्वत:च्या नावावर असलेला बंगला विसूच्या नावे करून आनंदी डोळे मिटते. कादंबरीचे कथानक असं आनंदीच्या व्यथेभोवती विणलेलं आहे. ओघात तत्कालीन घटनांचा वापर करून त्यांची गुंफण लिहिताना लेखिकेनं केली आहे. प्रतीत होणार्या अर्थाच्या संदर्भात कोणतंही भाष्य यात नाही. तसंच समाजातल्या अनेक तत्कालीन दोषांचा किंवा अस्पृश्यतेसारख्या सामाजिक वास्तवाचा उल्लेख कुठं नाही हे जरा खटकतं. पण स्वातंत्र्यपूर्व काळाची पार्श्वभूमी आणताना त्यातला तपशील एएतिहासिकतेला धरून मांडण्याचा लेखिकेचा प्रयत्न आहे. स्त्रीजीवनाची तत्कालीन कुतरओढ वेगवेगळ्या स्तरांवरील स्त्रियांच्या व्यक्तिरेखांमधून यात साकारली आहे. कादंबरी फार मोठया उंचीवर जाणारी नसली, तरी गत कालखंडाच्या चेहरामोहरा टिपण्याचा यातील प्रयत्न वाचकांनाही स्मरणरंजनाचा अनुभव घडवणारा ठरावा.
- नंदिनी आत्मसिद्ध
|
 |
 |
|