|
पहाटसरी
Author: यशवंत पाठक
Publisher: ग्रंथाली प्रकाशन
|
|
Price: $10.66 $8.52 20% OFF ( ~330 Pages, R350)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: आज जगण्यासाठी माणसाला सारे काही उपलब्ध होत आहे. जगातल्या वस्तू तो आहे त्या जागी सहज आणू शकतो. फेस बुकच्या आधारे तो कुणाशीही सख्य (सोयीस्कर रीत्या) ठेवतो, मात्र त्याला त्याचा फेस शोधताना, तोंडाला फेस येतो. इंटरनेटी मैत्रीला कधी कधी ग्रहण लागते. माहितीच्या संकेतस्थळांच्या गर्दीत मुळातले ज्ञान गुदमरले आहे. या आधुनिक बाबी वाईट नाहीत. त्यांचा विधायक उपयोग करण्याऐवजी सायबर गुन्हे वाढले आहेत. अभ्यास सखोल होत नाही. अवास्तव तंत्रज्ञानाने माणसाचे पॅकेजच्या नावाखाली गाठोडे झालेय. नव्याच्या नावाखाली बाजारात काहीही खपते आहे. बॅण्डेडच्या फॅशनपायी माणसात नैसर्गिक सुदृढता दिसत नाही. संशोधनाला दिशा नाही. परीक्षांचे पेपर फुटताहेत. अभ्यासापेक्षा प्रश्नांच्या चाकोरीतल्या सरावापायी गुणवत्ता खालावली आहे. या सार्यातून वाचायचे असेल, तर आधी भल्या पहाटे आपण आपल्याला निरामय वाचायला हवे. आपल्या क्षमतेचा अंदाज घ्यायला हवा. एकाने सरी घातली की आपण लगेच दोरी घालायला नको. गवताच्या पात्याने कांचनगंगाचा कधी तरी द्वेष केला काय? चिमणीने चुकून गरुडाचा हेवा केला? झर्याने समुद्राला वाकुल्या दाखवल्या? __या जगात वावरताना माणसाची जाणीव घट्ट असावी. दिखाऊपणाला किती मानायचे; याचा विचार करायला पाहिजे. याने आपल्या आतल्या आवाजाला आपण नाहीसे करतो. म्हणून आपण फुलत नाही. आपल्या आतला बहर करपतो. यासाठी आपला विचार आपण सखोल करायला हवा. याची सवय लागावी म्हणून या 'पहाटसरी' आपल्याला देतोय. कधी कधी शब्द आपण वापरतो, तो केवळ सवयीने. त्याला अर्थाची केवढी खोली आहे याचा पत्ता नसतो. या पुस्तकात ते आढळेल. विचार करण्याची सवय जडेल. हे अवचित होणार नाही, याची पूर्ण जाणीव आहे. तरीही चांगले वाचल्याचे समाधान नक्की मिळेल. - डॉ. यशवंत पाठक विचार करायच्या सवयीने दिवस उजाडणे ही खरी पहाट आहे. पहाटसरीत विविध आगळेवेगळे विवेचन असावे. विषयांमध्ये तथ्य वाटावे. आपल्या जीवनाचे सोलीव सुख यात आहे हे कळावे. या पुस्तकात ज्ञानेश्वरीवर आधारित विवेचन आहे.
|
 |
 |
|