|
महाराष्ट्राचं चांगभलं
Author: रत्नाकर मतकरी
Publisher: मॅजेस्टिक प्रकाशन
|
|
Price: $5.14 $4.11 20% OFF ( ~100 Pages, R150)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: महाराष्ट्र राज्याने गेल्या पन्नास वर्षांत जे कमावले-गमावले त्याविषयींचे वास्तववादी लेखाण.
महाराष्ट्राची लावणी भुर्रर्र पाही चकित होऊन दुनिया ग सारी बाई माझ्या राज्यानं घेतली भरारी बाई महाराष्ट्रानं घेतली भरारी|ऽ खर्च कराया चंगळ किती किती सोयी चकाचक उंच मॉल उभे त्यांच्यापायी रस्ते अपुरे पूल करिती उड्डाण सेतू सागरी रचे नवं रामायण रस्त्यामध्ये माझ्या आता धावे फेरारी बाई महाराष्ट्रानं घेतली भरारी | |१| | माझा मंत्रिराजा किती चतुर गुलजार त्याचा थोरामोठ्यांशी ग चाले व्यवहार मंत्रालयी त्याचा महाल शोभिवंत सजविला करुनिया लाखांची खैरात जनतेच्या गरिबीची चिंता रात्रंदिन करी बाई महाराष्ट्रानं घेतली भरारी | |२| | शेतीमध्ये नाही राम, बनवा वाइन दारू गाळा भाकरीचे धान्य घेऊन बाइल ना पैसा मिळवी, दुजाकडे धाडा मंत्र विकासाचा असा, व्यवहारी गाढा सांगतात अनुभवी थोर जाणकारी बाई महाराष्ट्रानं घेतली भरारी | |३| | - रत्नाकर मतकरी
"महाराष्ट्र हा देशाचा खड्गहस्त आहे, असे म्हटले जाते. मात्र, सत्तेचे राजकारण करण्यात मश्गूल असणारे सत्ताधारी आणि बेजबाबदार विरोधी पक्ष यांच्यामुळे गेल्या काही वर्षांत हा खड्गहस्त शक्तिहीन होताना दिसत आहे. याचाच आलेख ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार रत्नाकर मतकरी यांनी या पुस्तकात मांडला आहे. संयुक्त महाराष्ट्राने सुवर्णमहोत्सवापर्यंत काय कमावलं, काय गमावलं याचा आढावा घेण्यासाठी त्यांनी यात नाट, नृत्य, संगीत, चित्र, छायाचित्र असा टोटल थिएटरचा प्रकार हाताळला आहे. एकीकडे टोलेजंग इमारती आणि त्यांच्यासमोरच अवाढव्य पसरलेली झोपडपट्टी दर्शविणार्या मुखपृष्ठापासून हे पुस्तक लक्ष वेधून घेते. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या हुतात्म्यांना.. शरमपूर्वक ही त्यांची अर्पणपत्रिकाही अस्वस्थ करते. काहीशा प्रहसनात्मक शैलीत लिहिलेल्या या नाटामध्ये आत्माराम पाटील, ग. त्र्यं. माडखोलकर, वामनराव कर्डक, अण्णाभाऊ साठे आदींच्या रचनाही मतकरींनी चपखलपणे वापरलेल्या आहेत. राजकारण्यांनी जनतेला दाखवलेली स्वप्ने आणि त्यातील फोलपणा या पुस्तकात प्रकर्षांने समोर येतो. अनुभव मासिकाचे संपादक डॉ. सुहास कुलकर्णी यांनी स्वतंत्र प्रकरणाद्वारे या पुस्तकाचा समारोप केला असून, अपात्र राजकारण्यांनी महाराष्ट्राच्या केलेल्या दूरवस्थेचा परखड शब्दांत समाचार घेतला आहे." -- अनिरुद्ध भातखंडे, लोकसत्ता १२ फेब्रुवारी २०१२
|
 |
 |
|