|
स्थित्यंतर
Author: सारंग दर्शने
Publisher: अनुभव प्रकाशन
|
|
Price: $7.61 $6.08 20% OFF ( ~310 Pages, R250)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: ई-सकाळ रविवार ८ जानेवारी २००६ गावांच्या बदलांच्या नोंदी
गावे झपाटयाने बदलू लागली आहेत. आपण पूर्वी पाहिलेला गावाचा चेहरा आता उरलेला नाही, असे कित्येकदा वाटते. जगाच्या गतिमानतेत असे घडणे हे स्वाभाविक आहे. हे 'स्थित्यंतर' नेमके कसे दिसते? गावं बदलली म्हणजे नेमके काय घडले? याचा वेध काही लेखकांनी घेतला आहे. काहीसे स्मरणरंजनात्मक असे हे लेखन असले, तरी बदलांच्या नोंदी करण्याचं एएतिहासिक काम या पुस्तकाने साधले आहे. नाशिकचे निव्वळ तीर्थक्षेत्र असे रूप आतापावेतो होते. पण आता तेथे रुद्राक्ष संस्कृती जाऊन द्राक्ष संस्कृती आली असल्याची नोंद प्रकाश अकोलकर करतात. ब्रह्मगरीवर शंकरानं जटा आपटल्यापासून इ. स.नव्वदपर्यंतदेखील झाले नसतील एवढे गेल्या दहा वर्षांत त्र्यंबकेश्वर बदलले आहे, असे उदय तानपाठक सांगतात. 'भिक्षुकी' या शब्दात 'दारिद्यर' हा अर्थ अंतर्भूत होत होता; पण या भिक्षुकीनेच त्र्यंबकेश्वर येथे होंडा, मॅनेरा अशा गाडया आल्या आहेत. येथील भिक्षुकीही 'सर्व्हिस इंडस्ट्रीज'च्या धर्तीवर बांधली गेली आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे.
वामन पात्रीकर यांनी 'बैतूल'चे सुरेख रेखाटन केले आहे. आल्हाद गोडबोले यांनी 'दिघंची'तील बदलांच्या केलेल्या नोंदीही विचार करण्याजोग्या आहेत. 'स्थित्यंतरे' हा जगाचा नित्यक्रम आहे. आणि बदलाचाही एक बदलता वेग असतो याकडे पात्रीकर लक्ष वेधतात, तर श्री. गोडबोले यांनी नोंदवलेले 'पुढारलेल्या गावाचे उठून चाललेल्या गावात झालेले' स्थित्यंतर प्रातिनिधिक व बोलके वाटते. अशोक नायगावकर, अजय जाखडे, राजू परुळेकर, आनंद यादव, रा. सु. गवी, सारंग दर्शने यांनी रेखाटलेली स्थित्यंतरेही वाचनीय आहेत.
|
 |
 |
|