|
केला धर्माचा लिलाव
Author: य. दि. फडके
Publisher: अक्षर प्रकाशन
|
|
Price: $6.85 $5.48 20% OFF ( ~220 Pages, R200)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: लोकसत्ता रविवार, ९ मे २००४ धर्माची बोली लावणारी 'व्याघ्रमंडळी'
धर्म ही अफूची गोळी आहे, असे कार्ल माकर्स म्हणायचा. अफूचे दोन गुणधर्म आहेत. एक म्हणजे कमालीची ग्लानी आणणे आणि दुसरे म्हणजे शरीर, आरोग्य यांची हानी करणे. गेल्या दोन हजार वर्षांच्या इतिहासावर दृष्टी टाकली तर कोणत्याही धर्माने मानव समाजाचे कल्याण झालेले दिसत नाही. प्रत्येक धर्माच्या लोकांनी आपापल्या धर्माचे मोठेपण दाखविण्याच्या आणि त्याचे श्रेष्ठत्व इतरांवर लादण्याच्या प्रयत्नात मानव समाजात परस्परांबाबत विद्वेष पसरवून मानव जातीचे अपरिमित नुकसान केलेले आहे. हे कोणा एका धर्माच्या बाबतीत नव्हे; तर सर्वच धर्मांच्या बाबतीतील विदारक सत्य आहे. पूर्वी कर्मठ धर्म पंथवाद्यांनी ज्या चुका किंवा चुका म्हणण्यापेक्षा प्रमाद केले तेच प्रमाद आज सुसंस्कृत आणि सुशिक्षित समाजातील तथाकाथित धर्मवादी लोक करीत आहेत; याचे कारण या कोणालाच धर्म कळलेला नाही. दुसर्या धर्माचा द्वेष हाच ज्यांनी धर्म मानला त्यांच्याकडून जातीय सलोखा, शांततापूर्ण सहजीवन आणि अंतिमत: मानव धर्म, मानवजातीचे कल्याण या गोष्टींची अपेक्षाच करता येणार नाही.
धर्म बापा ज्यांचा त्यांनी प्रिय मानावा प्राणाहुनी; परि विधर्मीयांच्या ठायीं आलोट प्रेम धरावे हो!
आसे शेगांवचे संत गजानन महाराज यांनीही म्हटले होते. प्रत्येक थोर आणि विचारी व्यक्तींनी हाच उपदेश केलेला आहे, पण लक्षात कोण घेतो ? आज तर राजकीय पक्षांच्या नेत्यांना धर्म हे आपल्या साध्यासाठीचे साधन वाटते आहे. 'केला धर्माचा लिलाव' या आपल्या पुस्तकात विचारवंत डॉ. य. दि. फडके यांनी हीच खंत फार चांगल्या प्रकारे मांडली आहे. बा. सी. मर्ढेकर यांची एक काविता-
का हो माजविता दुही माखता स्वातंत्र्याची वही स्वजन रक्ताने प्रत्यही लळथळा...!
य. दि. यांनी या कावितेचा संदर्भ यात दिला आहे. स्वातंत्र्याच्या लढयातही आपल्याच देशबांधवांच्या रक्ताचे पाट वाहिले. फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलींमध्ये हिंदू- मुस्लिमांनी एकमेकाचे प्राण घेतले. या आगीत संपूर्ण देश पोळून निघाला. अतोनात हानी झाली; आज अर्धशतक उलटल्यानंतरसुद्धा परिस्थितीत बदल झालेला नाही. मर्ढेकरांच्या कावितेतील त्यानंतरच्या ओळी तर आजच्या परिस्थितीला अगदी चपखल म्हणजे आजच्या पिढीच्या भाषेत सांगायचे तर 'फिट्ट' बसणार्या आहेत.
केला धर्माचा लिलाव बुरखेवाली सत्ता-हाव; येथे तुम्हा-आम्हां राव मात्र मौत!
सत्तेसाठी धर्माचा वापर केला जातो. मर्ढेकरांना जून पन्नास वर्षे होत आली, तरी आज हेच होते आहे. उलट पुढारलेल्या, सुशिक्षित समाजात या गोष्टी कमी व्हायला पाहिजेत, नष्ट व्हायला पाहिजेत; पण उलट त्या वाढल्या... मग आम्ही उलट दिशेने चाललो आहेत काय? आज खरी गरज आहे ती, धर्मा-धर्मातील तेढ, विद्वेष नष्ट करणार्या नेत्यांची... दुर्दैवाने आज असे नेतेच नाहीत. आजचे नेते हे संघटित गुन्हेगारांच्या टोळयांचे पोशिंदे... त्यांना तर दंगली हव्याच असतात. त्यांनीच घडवून आणलेल्या दंगलींची चौकशी करणारे आयोग नेमले जातात. कमालीची दिरंगाई करुन या आयोगांनी सादर केलेले अहवाल प्रसिद्ध होण्यासही आणखी विलंब... इतका की तोपर्यंत दुसरी दंगल भडकलेली असते...! य. दि. व्यथित मनाने सत्यस्थिती मांडतात. रा. स्व. संघ, धर्म शब्दाचे विविध अर्थ, धर्माच्या स्तोमाप्रमाणेच सायंटिझम... विज्ञानाचे स्तोम, पाकिस्तानातील आजपर्यंतच्या राजवटी, २४ वर्षांपूर्वी उदभवलेले शीख पंथाचे तथाकाथित जहाल पुढारी संत जर्नेलसिंग भिंद्रनवाले आणि 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार'मध्ये त्यांचा झालेला अंत, धर्म, हिंदुत्व आणि राजकारण आणि इतर मुद्दे य. दि. यांनी या पुस्तकात चचिले आहेत. धर्म म्हणजे कलह माजविण्याचे सहज सोपे साधन असा आपल्या सोयीसाठी अर्थ लावून स्वार्थी पुढार्यांनी धर्माच्या नावाखाली सामान्य इतरेजनांना झुंजत ठेवून त्यांचे नुकसान केले आणि स्वत:ची पोळी भाजून घेतली...!
धर्म म्हणजे खरे तर शांत, शिस्तबद्ध, नियमबद्ध सहजीवनाची आखीव पद्धती... असा व्यापक अर्थ... अंतिमत: मानवजातीच्या कल्याणासाठी जे जे केले जाईल तो धर्म... हा अर्थ एक तर आम्हाला कळला नाही, किंवा त्याच्याकडे आम्ही हेतुपुरस्सर डोळेझाक केली... इतकी वर्षे झाली, सर्व क्षेत्रात सुधारणा झाल्या... पण धर्माचा लिलाव काही थांबत नाही... आज आम्ही सुशिक्षित आहोत, पण सुसंस्कृत नाही असे म्हटले तर तथाकाथित राजकीय व्याघर मंडळी नखांचा पंजा उगारुन आहेतच...!
आनिल पं. कुलकर्णी
|
 |
 |
|