|
देवाशपथ खरं लिहीन
Author: चंद्रकांत मांडरे
Publisher: अमेय प्रकाशन
|
|
Price: $12.03 $9.62 20% OFF ( ~380 Pages, R395)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: ई-सकाळ रविवार १८ डीसेंबर २००५ देवाशपथ वाचाच !
मराठी चित्रपटांना अस्सल ग्रामीण बाज आणि मराठमोळेपण बहाल करणार्यांमध्ये व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, दिनकर द. पाटील यांच्याप्रमाणेच बाबूराव पेंढारकर, दादा साळवी यांच्यासारख्या अभिनेत्यांचाही समावेश होतो. शहरी मध्यमवर्गीयांनी ज्यांची सरसकट तमाशापट म्हणून संभावना केली त्यापैकी बर्याच चित्रपटांची बोली आणि बाज मराठी होता. हिंदी चित्रपटांच्या प्रभावाखालील मराठीपटात हायब्रीड शैली दिसते, ती यापैकी अनेक चित्रपटांमध्ये दिसत नसे. 'बॉंबे' स्टाईल मराठीपटांमधले कितीतरी नट हिंदी फिल्मी स्टाईल नाचतात, कपडे घालतात आणि बडबडतात. या कलमी संस्कृतीपासून कित्येक कोस दूर असलेले देखणे आणि मर्दानी नट म्हणजे चंद्रकांत मांडरे. नायक, खलनायक, चरित्र अभिनेता अशा विभिन्न भूमिका करणारे. मराठीप्रमाणेच हिंदी चित्रसृष्टीदेखील गाजविणारे चंद्रकांत यांनी १७ फेब्रुवारी २००१ ला इहलोकाचा निरोप घेतला. त्यानंतर चार वर्षांनी 'देवाशपथ खरं लिहीन' हे त्यांचे आत्मकथन प्रसिद्ध झाले आहे.
पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी म्हटले आहे, की ''वयाच्या दहाव्या वर्षापासून अखेरपर्यंत, म्हणजे १७ फेब्रुवारी २००१ पर्यंत चंद्रकांतांनी नियमितपणे डायरी लिहिली. एका समर्थ अभिनेत्याचे आणि प्रतिभाशाली चित्रकाराचे हे आत्मकथन म्हणजे मराठी संस्कृतीचा दस्तएएवज ठरेल, असा विश्वास वाटतो.''
हे आत्मकथन अगोदर 'सकाळ' (कोल्हापूर आवृत्तीत) मध्ये क्रमश: प्रसिद्ध झाले आहे. आपल्या दैनंदिनीमधून महत्त्वाच्या बाबींची टिपणे काढून चंद्रकांत मांडरे दर आठवडयाला विजय चोरमारे यांच्याशी संवाद साधत. त्यातूनच या आत्मकथनास आकार मिळत गेला.
मांडरे कोल्हापूरचेच. त्यांच्या वडिलांचे इंग्लिश टोप्या व अत्तर विकण्याचे दुकान होते. वडील नाटक-चित्रपटांचे शौकीन होते. बाबूराव पेंटर यांच्या 'गजगौरी'त त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका केली होती. वडीलच चंद्रकांतना घेऊन बाबूराव पेंटरांकडे गेले. तेव्हा त्यांचे ड्रॉइंग बघून कंपनीतले बाबा गजबर म्हणाले, ''मुलाचं ड्रॉइंग चांगलं आहे. त्याला मी शिकवेन; पण एक अट राहील. त्यानं कंपनीतल्या माझ्या खोलीतच बसून चित्रं काढली पाहिजेत. शूटिंग सुरू असताना त्याने तिथं थांबता कामा नये.'' त्या वेळचे चंदेरी सृष्टीतील वातावरण किती घरगुती, चांगल्या वळणाचे होते, याची यावरून कल्पना येते.
१९३२ मध्ये आनंद फिल्म्स कंपनीच्या 'प्रीतिसंगम' या मूकपटात चंद्रकांत यांना बेरडाची भूमिका मिळाली. जोर-बैठकांची दणकट व पिळदार प्रकृती असल्याने त्यांना हे काम मिळाले व चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून त्यांचा प्रवेश झाला. 'सावकारी पाश' या मूकपटात शेतकर्याच्या मुलाचे जे काम शांतारामबापूंनी केले, ते बोलपटात चंद्रकांत यांना करायला मिळाले. डोक्यावरचे सगळे केस कापलेले, अंगात धोतर आणि कुडते. 'सावकारी पाश' हा पहिला वास्तववादी चित्रपट आणि त्यात काम करण्याची संधी चंद्रकांतना लाभली.
मात्र चित्रपटात अभिनय करताना ते चित्रकलेला विसरले नाहीत. पन्हाळा, रंकाळा इथे जाऊन तिथला निसर्ग ते कागदावर उतरवत. त्यांची चित्रे बघून बाबूराव पेंटर मौलिक सूचना करत. ''आकाश, डोंगर, झाडे, पाणी, जमीन यांचे निसर्गातील मिळतेजुळते रंग अजून तुझ्या चित्रात उतरत नाहीत. पेपरच्या आकारमानात निसर्गाचा भव्यपणा वाटत नाही. लहान किंवा मोठया कागदावर आबालाल मास्तरांनी काढलेली चित्रे पाहत जा. त्यात खराखुरा निसर्ग दिसेल,'' असे म्हणत.
भालजी पेंढारकर यांच्या 'थोरातांची कमळा'च्या तालमी सुरू असतानाच भालजींनी चंद्रकांत यांना शांतारामबापूंना भेटायला सांगितले. 'शेजारी'तले जिवबाच्या मुलाचे काम त्यांना मिळाले. 'थोरातांची कमळा'त 'कमळा' (सुमती गुप्ते) मराठमोळी दिसावी म्हणून भडक नव्हे, तर माफक 'मेक-अप'चा आग्रह भालजींनी कसा धरला, हे सूक्ष्म निरीक्षण चंद्रकांत यांनी नोंदविले आहे. स्वातंत्र्यलढयासाठी भालजींबरोबर कोल्हापुरात झोळी घेऊन पृथ्वीराजजी कसे फिरले, याची हकिगत वाचायला मिळते.
गोविंदराव टेंबेंचा सहवास, गांधीजींचे दर्शन, औंधच्या महाराजांशी |ऋ|णानुबंध, बालगंधर्वांना पाहिले तो प्रसंग, या घटना चंद्रकांत यांच्या काळजात घर करून राहिल्या असल्याचे दिसते.
हातात कुंचला असल्याने ते निसर्गचित्रात हरवून गेले होते, पण माणसांची अक्षरचित्रेही त्यांनी 'देवाशपथ'मध्ये सुरेख रेखाटली आहेत. शब्दांकनही साधे, अनलंकृत- अगदी थेट चंद्रकांत मांडरे यांच्यासारखे! हा आडदांड माणूस कमालीचा निगर्वी, सज्जन आणि निर्मळ अंत:करणाचा. ई, पत्नी, भाऊ सूर्यकांत यांच्यावर अतोनात प्रेम करणारा, गुरुस्थानी असलेल्या भालजी, बाबा गजबर, बाबूराव पेंटर, आबालाल रहेमान यांचा आदर करणारा, पापभीरू, ढोंग न करणारा आणि कुणावरही चिखलफेक करण्याचे टाळणारा.
प्रसिद्ध चित्रकार-नायक असूनही सामान्य मध्यमवर्गीयासारखे साधेसरळ जगणारा माणूस. परटीका आणि आत्मसमर्थनासाठीच आत्मचरित्रे लिहिली जातात, ही समजूत खोटी पाडत चंद्रकांत मांडरे यांनी 'देवाशपथ खरं लिहिलं' आहे. वाचकांनी ते खरेच वाचलेच पाहिजे! (बाबू मोशाय)
Review courtesy of Maharashtra Times: महाराष्ट्र टाईम्स रविवार २२ मे २००६ 'चंदकांत' नावाची गाथा!
अभिनेते चंदकांत म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतलं एक मानाचं पान. कलानगरी कोल्हापुरातलं एक मोठं प्रस्थ. 'देवाशपथ खरं लिहीन' हे त्यांचंच आत्मचरित्र. नट-नट्यांच्या आयुष्याबद्दल सामान्य माणसाला नेहमीच कुतूहल वाटत राहिलं. हे कुतुहल शमवताना चंदकांत यांनी सद्य परिस्थिती दडवलेली नाही. पन्नासहून अधिक काळ ज्यांनी रूपेरी पडद्याशी इमान राखलं असा मनस्वी कलाकार जेव्हा आत्मचरित्रातून बोलू लागतो तेव्हा वाचकांच्या डोळ्यापुढे त्याचं विश्व उभं राहतं. चंदकांत आणि सूर्यकांत मांढरे यांच्या देखण्या रूपाला अभिनयाची जोड लाभली आणि त्यातून दोन समृद्ध कलाकार मराठी चित्रपटसृष्टीला कसे मिळाले, याचा आलेख हा या आत्मचरित्राचा गाभा. पण या एका गोष्टीचं फारसं अवडंबर न माजवता वैयक्तिक आयुष्यातल्याही बर्याच गोष्टी ओघाने येतात.
चंदकांत रूपेरी पडद्यावर प्रवेश करण्यापूवीर म्हणजे १९२० च्या दशकातल्या काळापासून हे आत्मचरित्र सुरू होतं. चित्रपट क्षेत्रातला प्रवेश हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. पण चित्रपटातून मिळालेली प्रसिद्धी आणि प्रसिद्धीच्या वाटेने चालून आलेल्या सत्कार-समारंभांपुरतं हे आत्मचरित्र मर्यादित नाही. सुमारे ८० वर्षाचा काळ या आत्मचरित्रात येतो आणि त्यातून उलगडत जातं एका कलाकाराचं तावून सुलाखून घडतं गेलेलं जीवन. कधी खाचखळगे तर कधी आनंद सोहळे!
चंदकांत यांच्या जीवनातल्या अनेक महत्त्वाच्या टप्प्यांना स्पर्श करत असताना एका टप्प्यावर वाचकांची ओळख होते अभिनेते चंदकांत यांच्याशी. मग तिथून सुरू होतो त्यांचा चित्रपटसृष्टीतला प्रवास. या प्रवासातल्या प्रत्येक पानावर चंदकांत यांच्या बरोबरीने नाव येतं ते अभिनेते सूर्यकांत याचं आणि ते स्वाभाविकच आहे. चंदकांत-सूर्यकांत या जोडगोळीची प्रतिभा पानापानावर उमटली आहे.
इंडस्ट्रीतल्या पंचवीस वर्षांच्या कालावधीचा सगळा लेखाजोगा या कलाकाराने अगदी मोकळेपणाने आणि कुठलाही आडपडदा न ठेवता मांडला आहे. आयुष्याचा जमाखर्च त्यांनी प्रामाणिकपणे मांडला आहे आणि म्हणूनच 'देवाशपथ खरं लिहीन' हे पुस्तकाचं नाव सार्थ ठरतं. खरं लिहिण्याची सवय शाळेत असल्यापासूनच आपल्याला कशी लागली याची गोष्ट गमतीशीर आहे. पुस्तकाची सुरुवातच या गोष्टीपासून होते. ज्याची चित्रकला पाहिल्यावर खुद्द निसर्गालाही आपण आरशात पाहतोय असं वाटावं अशी चंदकांत यांची चित्रं पुस्तकात वाचकांशी थेट संवाद साधतात. जुन्या कृष्णधवल फोटोंतून लेखकाने अनेक आठवणी जागवल्या आहेत. त्यामुळेच पुस्तकाला एक वेगळंच परिमाण प्राप्त झालंय. बोलण्याच्या ओघात पुस्तक लिहिलं गेल्याने काही संदर्भांची पुनरावृत्ती झाली आहे. ती टाळता आली असती.
या पुस्तकाने चंदकांत यांच्यात दडलेल्या एक चित्रकाराची, कोल्हापुरातले कुस्तीचे फड रंगवणार्या एका रांगड्या कुस्तीवीराची, एका कुटुंबप्रमुखाची, एका दिग्दर्शकाची आणि एका निर्मात्याची ओळख वाचकांना करून दिली आहे. १९३२ मधल्या 'प्रीतीसंगम' या त्यांच्या पहिल्या मूकपटापासून १९९४ सालच्या 'बनगरवाडी' सिनेमापर्यंतचा टप्पा यात आहे. या वाटेत अनेक माणसं आपल्याला भेटतात आणि माहितीचं दालन समृद्ध करून जातात. शरद पवार यांनी लिहिलेली प्रस्तावना हे पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य. चंदकांत यांचं सामाजिक कार्य, वयाच्या ८७ व्या वषीर शिवाजी विद्यापीठातून मिळवलेली डी.लिट. पदवी, देशा-परदेशात झालेले सन्मान, हिंदी चित्रपटसृष्टीतलं त्याचं कार्य, जन्मभूमी कोल्हापुरात उभी केलेली कला अकादमी या सगळ्या घटनांशी वाचकांची ओळख होते आणि या कलाकाराविषयी असलेला आदर द्विगुणित होतो.
- मनीषा नित्सुरे
|
 |
 |
|