|
विभ्रम
Author: डॉ. विलास खोले
Publisher: अनघा प्रकाशन
|
|
Price: $10.66 $8.52 20% OFF ( ~310 Pages, R350)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: हे पुस्तक म्हणजे विलास खोले यांनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचं संकलन आहे. यात पुस्तकांची परीक्षणं आहेत, त्याचप्रमाणे विविध चर्चासत्रांत वाचलेले निबंधही आहेत. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व लेख तात्कालिकतेचं परिमाण ओलांडणारे आहेत. त्यांना सार्वकालिक मूल्य आहे. 'विभ्रम'मध्ये कविता कादंबरी आणि आत्मचरित्र असे तीन विभाग असून कवितासंग्रह, कांदबरी आणि चरित्र-आत्मचरित्रावरची परीक्षणं किंवा निबंध त्या-त्या विभागात एकत्र करण्यात आलेले आहेत. पैकी कविता आणि कादंबरी विभागात प्रत्येकी ९ लेख आहेत. तर आत्मचरित्र विभागात ५ लेख आहेत. अनेकदा परीक्षणांच्या पुस्तकाचा जीव खूप लहान असतो. कारण वेगवेगळ्या काळात प्रकाशित झालेल्या पुस्तकांचं परीक्षण त्या-त्या वेळी महत्त्वाचं असलं, तरी मागाहून त्याला काही अर्थ उरतोच असं नाही. परंतु विलास खोले यांची खासीयत म्हणजे, कुठल्याही पुस्तकाचं परीक्षण ते संदर्भमूल्य पद्धतीने करत असल्यामुळे, कितीही काळ उलटला, तरी त्या परीक्षणातील संदर्भ जुने होत नाहीत. यासंदर्भात आपण अरुण कोलटकरांच्या 'भिजकी वही'चे उदाहरण पाहू. 'भिजकी वही'वरील लेखात ते एके ठिकाणी म्हणतात- 'भिजकी वहीमधील कविता मूलत: कथनात्म स्वरुपाच्या आहेत. ऋग्वेदकालीन भूतकाळातील 'अपाला'च्या कथेपासून, ग्रीकांच्या इसवीसनपूर्व इतिहासापासून, येशू ख्रिस्ताच्या जीवनचरित्रपासून थेट रशियातील स्टॅलिनशाही, व्हिएतनामचे युद्ध समकालीन भारतातील अत्याचाराच्या-दहशतीच्या घटना येथपर्यंत या कवितांतर्गत कथांचे संदर्भ पसरलेले आहेत.' म्हणजे परीक्षण असो किंवा निबंध, खोले सर विविध संदर्भांनिशी त्या विषयवस्तूचा पाठपुरावा करतात. परिणामी लेख वाचनीय तर होतोच, शिवाय त्याला संदर्भांमुळे अधिकची अर्थवत्ताही प्राप्त होते. 'विभ्रम'मधील कुठल्याही विभागातला कुठलाही लेख वाचा, हा अनुभव येतोच. मग ते कविता विभागातील 'तृतीय पुरुषाचे आगमन' या कवितासंग्रहाचे परीक्षण असो, कादंबरी विभागातील 'बखर एका राजाची'चे असो किंवा आत्मचरित्र विभागातील 'करुळचा मुलगा' या मधु मंगेश कर्णिक यांच्या आत्मचरित्राचे परीक्षण असो. ते आज-आता वाचतानाही आजचेच वाटते, जुने वाटत नाही. -- मुकुंद कुळे, म. टा. ५ जून २०१६
Maharashtra Times Review
|
 |
 |
|