|
श्रीपर्वताच्या छायेत
Author: डॉ. रा. चिं. ढेरे
Publisher: पद्मगंधा प्रकाशन
|
|
Price: $9.14 $7.31 20% OFF ( ~310 Pages, R300)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: श्रीपर्वत हे आंध्रातले मल्लिकार्जुन शिवाचे प्रसिद्ध उपासनाकेंद्र आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले हे स्थान जवळजवळ दीड हजार वर्षे भारतातल्या शिवभक्तांचे एक महान साधनाकेंद्र म्हणून गाजत आले आहे. बौद्धांच्या मंत्रयान आणि वज्रयान पंथांची ती जन्मभूमी. शैव आणि शाक्त तांत्रिकांची प्रख्यात कर्मभूमी. पारंपरिक ग्रंथांतून उल्लेखलेले हे नाथपंथाचे उदयस्थान. महाराष्ट्राशी या परिसराचे दृढ संबंध होते. महानुभावपंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी, सिद्धयोगी चांगा वटेश्वर आणि त्यांची गुरू, गोरक्षनाथशिष्या योगिनी मुक्ताबाई यांचीही साधना श्रीपर्वताशी निगडित होती. एकूणच महाराष्ट्राच्या शैव विचारधारांवर श्रीपर्वताचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष पण अत्यंत गाढ परिणाम आहे. इथल्या शिवोपासनेला आणि शैव साहित्याला भारतीय पातळीवरच्या विविधांगी शिवोपासनेशी जोडून देणार्या श्रीपर्वताच्या छायेत महाराष्ट्रातल्या धार्मिक-सांस्कृतिक इतिहासातले काही महत्त्वाचे दुवे या ग्रंथात नव्याने उलगडले आहेत आणि काही कूट रहस्यांवरही नवा प्रकाश टाकला आहे. या ग्रंथात शिवोपासनेविषयीचे लेखन एकत्र गठित केले आहे. महाराष्ट्राच्या भूमीवर शिवोपासना प्राचीन काळापासून गाजत राहिली आहे आणि तिचा मूलस्रोत आंध्रातला श्रीपर्वत आहे. नागार्जुनाची जन्मभूमी विदर्भ; पण कर्मभूमी श्रीशैल पर्वत होती. महानुभाव पंथाचे श्रीचक्रधर यांनी श्रीपर्वतावर एकांतात एक तप काढले. श्रीचक्रधर, श्रीज्ञानदेव आणि श्रीमुकुंदराज या तिघांच्याही कार्य आणि विचारविश्वाशी श्रीपर्वताचा थेट संबंध असणे, याचा संबंध महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीशी आहे. श्रीपर्वत हे केवळ बारा ज्योतिर्लिगांपैकी एक लिंग म्हणून व शिवभक्तांचे श्रद्धास्थान आणि साधनास्थान म्हणून प्रसिद्ध असले तरी श्रीपर्वताची आणखीन काही वेगळी वैशिष्टे आहेत. बौद्धांच्या मंत्रयान आणि वज्रयान पंथांची ती जन्मभूमी आहे, तर शैव आणि शाक्त तांत्रिकांची प्रख्यात कर्मभूमी आहे. नाथपंथाचा उदयही येथूनच झाला. या पाश्र्वभूमीवर श्रीपर्वताचा महाराष्ट्राच्या शैव-विचारांवर, सांस्कृतिक आणि सामाजिक घटनांवर कोणता व कसा परिणाम झाला, हे जाणून घेणे महत्त्वाचे व आवश्यक ठरते. हे परिणाम नव्याने स्पष्ट करतानाच काही कूटरहस्यांचाही उलगडा यात केलेला आहे.
Loksatta Review
|
 |
 |
|