|
शब्द सोन्याचा पिंपळ
Author: सुनीलकुमार लवटे
Publisher: रावा प्रकाशन
|
|
Price: $6.34 $5.07 20% OFF ( ~160 Pages, R185)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: म. टा. १३ जुलै २०१४ साक्षेची साहित्य साधना -- वैजनाथ महाजन 'खाली जमीन वर आकाश' या लक्षवेधी आत्मकथनाने मराठी साहित्यात दूरवर पोचलेलं नाव म्हणजे प्रा. सुनीलकुमार लवटे. अर्थात त्यांचं लेखनकर्तृत्व या आत्मकथनापुरतं मर्यादित नाही, तर त्यांच्या नावे किमान वीसएक पुस्तकं आजमितीला जमा आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात त्यांनी उभारलेलं वि. स. खांडेकर यांचं संग्रहालय ही देखील त्यांच्या सांस्कृतिक कर्तृत्वाची आणखी एक मौलिक साक्ष आहे. वि. स. खांडेकर हे शेक्सपीअरपेक्षा तसूभर कमी नाहीत, असा त्यांनी या ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्याबद्दलचा अभिप्राय 'शब्द सोन्याचा पिंपळ' या आपल्या साहित्यविषयक लेखसंग्रहात स्पष्टपणे नमूद केलेला आहे. 'शब्द सोन्याचा पिंपळ' असं चित्ताकर्षक शीर्षक असलेलं त्यांचं हे पुस्तक म्हणजे त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या एकूण पंचवीस लेखांचा संग्रह आहे. संग्रहातील लेख जरी प्रसंगपरत्वे लिहिलेले असले, तरी ते प्रासंगिक नाहीत हे प्रारंभीच स्पष्ट केलं पाहिजे. साहित्य हे मनुष्य घडविण्याचं साधन आहे, अशी या बहुपेडी लेखकाची ठाम धारणा आहे. वाचनाने आपलं विश्व बहळतं असं पण त्याला वाटतं. म्हणूनच शब्द हा त्याला 'सोन्याचा पिंपळ' वाटतो आहे व त्यातूनच त्याला भावलेली शब्दशिल्पं तो या ठिकाणी उलगडून दाखवितो आहे. त्यामुळे हे सारेच लेख वाचनीय बनलेले आहेत. 'ज्वाला आणि फुले' सारखं बाबा आमटे यांचं विराट काव्य हे त्याला जहाल वेदनेच्या विषण्ण गीतासारखं वाटं, तर त्याचवेळी नारायण सुर्वेंची कविता म्हणजे एक प्रकारचा वंचितांचा टाहो वाटतो आहे. याच पद्धतीने लेखक मराठीतील वंचित साहित्याचा उद्गम शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्या निमित्ताने या लेखनाने मराठी साहित्याला दिलेल्या नव्या परिमाणाचा वेध घेण्याचा स्तुत्य प्रयत्नही करतो. संत कबीरांच्या साहित्यावर लेखक अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून पाहतो व त्या साहित्याचा त्या दिशेने ऊहापोह करतो. लेखकाला मानवी जीवनात पुस्तकाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, असं वाटतं. त्याकरिता तो 'पुस्तकाचे महत्त्व' असा स्वतंत्र लेखच लिहितो. यातून लेखक ग्रंथ साधनेचं महात्म्य अगदी सुलभ पद्धतीने आपणासमोर मांडतो. राष्ट्रभाषा हा लेखकाच्या अध्ययनाचा आणि अध्यापनाचा विषय असल्यामुळे बच्चन यांची 'मधुशाला' इथे अवतरणं तसं स्वाभाविकच म्हटलं पाहिजे. पण त्याहून महत्त्वाचा असा लेखकाने स्वातंत्र्योत्तर राजस्थानी साहित्याचा घेतलेला मागोवा साहित्याच्या अभ्यासकांना अधिक खुणावणारा आहे. सार्वजनिक ग्रंथालयांची स्थिती आणि गती लेखकाने अत्यंत साक्षेपाने या ठिकाणी मांडलेली आहे. ती ग्रंथालय क्षेत्रात कार्य करणार्या सार्यांनाच प्रेरणादायी वाटेल अशी आहे. 'गोदान' ही हिंदीतील सर्वश्रेष्ठ साहित्यकृती असल्याचा लेखकाचा अभिप्राय आहे. पुस्तकात साहित्य विषयाच्या अनुरोधाने समाविष्ट झालेलं वैविध्य निश्चितच दाद देण्यासारखं आहे. हे पुस्तक सांप्रतच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हाती पडणं गरजेचं आहे. भ्रमणध्वनीच्या मोहजालात अडकलेल्या पिढीला साहित्याची किमान गोडी लावण्याचं काम 'शब्द सोन्याचा पिंपळ'सारखं पुस्तक निश्चितच करेल असं वाटतं.
Maharashtra Times Review
|
 |
 |
|