|
अंतोजीची बखर
Author: नंदा खरे
Publisher: मनोविकास प्रकाशन
|
|
Price: $7.61 $6.08 20% OFF ( ~200 Pages, R250)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: उपहासात्मक शैलीतील ऐतिहासिक कादंबरी म. टा. ७ फेब्रुवारी २००४ अंतोजीची बखर नंदा खरे यांचे ' अंतोजींची बखर ' हे विनोदी अंगाने जाणारे पुस्तक आहे. पेशवाईचा काळ चित्रित करणार्या या बखरीत त्या वेळचे समाजकारण , राजकारण , राज्यांची व्यवस्था इत्यादिंचे यथोचित वर्णन आढळते. त्या काळातील घडामोडींवर अतिशय उपहासात्मक अशी टीका लेखकाने केली आहे. हे लेखनवैशिष्ट्य पुस्तकभर सोबत करते. जोडीला बखरीचा घाटही मजा आणतो. इतिहासकाळाचे विश्लेषण करताना , सरकार किंवा राज्यकतेर राज्याच्या नावावर करीत असलेली चक्क लूट अनेक प्रसंगांतून स्पष्ट होते. त्यांची छुपी टगेगिरी उघड होते. पेशवेकाळात ज्या ज्या ' मोहिमा ', ' लढाया ' झाल्या , त्यांत मोजक्या वेळांनाच राज्याचा फायदा होता , बाकी व्यक्तिगत हिताचीच प्रेरणा प्रबळ होती , याला या पुस्तकामुळे दुजोरा मिळतो. पेशव्यांचा काळ असो की आजचा ; भ्रष्टाचार सार्वकालिक आहे. आजचं तर काही बोलायलाच नको! पण आजच्या या विषण्ण करणार्या राजकीय , सामाजिक परिस्थितीचं मूळ आपल्या पूर्वकाळातच आहे , याची खात्री ' अंतोजींची बखर ' वाचून होते. राज्यकर्त्याला दंडेलशाही , टगेगिरी जमलीच पाहिजे , अशी तेव्हाही परिस्थिती होतीच. फक्त शिवाजी महाराज याला अपवाद होते. त्या काळात त्यांनी शेतकरी वा भाजीविक्रेते यांच्याकडून फुकटात काही घ्यायचे नाही , असे फर्मान काढले होते. या त्यांच्या दष्टेपणामुळेच ते वेगळे होते , असे लेखक म्हणतात. मोहिमेवरचा एक प्रसंग इतका खुलला आहे की , वाचकाच्या अंगावर काटा आल्याखेरीज राहात नाही. मोहिमेवर असताना एका सरदाराचा मृत्यू होतो. प्रथेप्रमाणे त्याची पत्नी सती जाते. हा प्रकार पाहून एका ब्रिटिश अधिकार्याचा मुलगा मानसिकदृष्ट्या खचतो आणि त्याच वेळेला एतद्देशीयांच्या चेहर्यावर मात्र बिचारीला स्वर्ग मिळाल्याचा आविर्भाव असतो. फारच वास्तवदशीर प्रसंग आहे हा! या बखरीत सत्यशोधन आहे इतिहासाचे सारे संदर्भ आहेत. पण कसे कोण जाणे , आपल्याकडे या पुस्तकाचे अजिबात कौतुक झालेले नाही. माणसाने कितीही उत्क्रांती केली , प्रगत तंत्रज्ञान आत्मसात केले , तरी तो समाधानी होत नाही , होणार नाही. कारण तो आपसात इतके तंटे वाढवतो आहे की , आत्मिक समाधान अजून काही वषेर त्याच्या वाटेला येत नाही. गुजरातची दंगल हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. गोरगरीबांना लाथाडून पुढे जाण्याचा जो पायंडा नेत्यांनी रूढ केला , त्याची पाळेमुळे संदर्भासहित या बखरीत सापडतील. - निळू फुले
Other Links:
|
 |
 |
|