|
दोन जुने अभिजात अर्थशास्त्रीय निबंध
Author: आनंद विनायक जातेगावकर
Publisher: लोकवाङमय गृह
|
|
Price: $4.79 $3.83 20% OFF ( ~140 Pages, R140)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: १८९४ व १९०५ सालचे 'निरपेक्ष भांडवल' व 'हिन्दुस्थानातील दुष्काळ' हे दोन जुने व तरी आजही संदर्भहीन न झालेले निबंध आहेत. पहिल्या निबंधात ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या आजही विचार करण्यायोग्य, तसेच अमलात आणण्यासारख्या आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास, त्याचे लेखक गो. अ. भट म्हणतात की, विलायती यांत्रिक शक्तीमुळे आमचे कारागीर बेकार झाले आहेत व यामुळे गरीबही झाले आहेत. दुसरा गो. गो. टिपणीस यांचा १९०५ सालचा निबंध, १९०३-०४ सालच्या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर आहे. टिपणीस म्हणतात की, जुन्या काळी युरोपात आपल्याकडील पोलाद जात असे. आपल्याकडे उत्तम स्टील बनवण्याची कृती अवगत होती. परंतु आज सुयांपासून ते अवजड मशिनरीपर्यंत सर्व वस्तू आयात होतात. तत्कालीन शिक्षण पद्धतीवर टीका करताना ते म्हणतात, सगळ्या शाळा केवळ मूलभूत शिक्षण देतात, यामुळे कारखाने काढणे हे शिक्षण घेतलेल्या मुलांना अशक्य होते. लोखंड वा इतर खनिज पदार्थावर प्रक्रिया करण्याचे कारखाने काढण्यासाठी तसे शिक्षण देणार्या 'शाळा' सरकारने उघडल्या पाहिजेत. परदेशी मालामुळे आपल्याला आपलाच कच्चा माल तयार मालात रूपांतरित झाल्यावर जास्त पैसे देऊन विकत घ्यावा लागतो. संपादन : नीरज हातेकर, राजन पडवळ loksatta Review
|
 |
 |
|