|
संसाराचा सारीपाट
Author: भा. ल. महाबळ
Publisher: दिलीपराज प्रकाशन
|
|
Price: $6.85 $5.48 20% OFF ( ~220 Pages, R225)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Review courtesy of Maharashtra Times: १९मार्च२००० संसाराचा सारीपाट - अनिल डोंगरे
कुटुंब, त्यातील एकोपा, नात्यागोत्यातील सहचार्याचा आनंद, त्याग, विश्वास आणि आहे त्यात आनंद मानण्याच्या समाधानी वृत्तीमुळे मागची पिढी सुखी होती. आजच्या पिढीला ना आदर्श उरले आहेत, ना नैतिक कर्तव्ये. या पिढीला फक्त सुखे हवी आहेत, आणि तीही झटपट. मात्र ताणतणाव, सुखदुख:, एकत्र कुटुंबपद्धती, वयोवृद्ध माणसे हे सारं असूनही सुखानं संसार करता येतो; तो कसा हे सांगण्यासाठी भा. ल. महाबळ यांनी संसाराचा सारीपाट हे पुस्तक लिहिले आहे. त्यातील लेख वेगवेगळया नियतकालिकांत आलेले असले तरी त्यातील विषयसूत्र समान आहे. या लेखांना कुटुंबलेखही म्हणता येईल. महाबळ यांच्या मते कुटुंबाची कल्पना तो, ती व त्यांची मुले अशी आटोपशीर नाही; तर त्याचे व तिचे आईवडिल आणि दोघांचेही नातेवाईक म्हणजे कुटुंब. जागेच्या टंचाईमुळे, व्यवसाय व नोकरीमुळे ही सर्व घटकमंडळी एका छत्राखाली राहात नसतीलही; त्यांच्यातील प्रेम, माया, आस्था, नातेसंबंध आणि आनंद वाटून घेण्याची वृत्ती ताणतणावातही कशी टिकवून ठेवता येते, याचाच डोळस आढावा महाबळ यांनी घेतला आहे. संसार गंभीरपणे करावा; पण तो जगण्याची वृत्ती मात्र हलकीफुलकी असावी, हेच महाबळ यांनी सर्व लेखांमधून सांगितले आहे. विवाहोत्तर वाटचालीत भांडयाला भांडे लागतेच; परंतु भांडे का लागले याची कारणे स्वत:च वारंवार तपासून घेत गेले की त्याची उत्तरे आपोआप सापडतात व वाद मिटतात. संसार दोघांचा असतो. नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांची भिंत त्याभोवती असते. ती तोडण्याचा कोणी प्रयत्न करू नये. संसाराचं बंधन कोणाला चुकले नाही, म्हणून ते गोड मानण्यातच खरी खुमारी असते हेच महाबळ यांनी विविध उदाहरणे देऊन पटवून दिले आहे. तेही चिमटे घेऊन व हलक्या फुलक्या वृत्तीने. लेखकाने उदाहरणासाठी घेतलेले प्रसंगही रोजच्या जीवनातील व नित्य घडणारे घेतले असल्याने ते मनाला भावतात. हल्ली विभक्त कुटुंब पध्दतीचा जोर आहे. असा जोर करणार्या जोडप्यांनी हे लेख जरूर वाचावेत.
|
 |
 |
|