|
मुक्काम शांतिनिकेतन
Author: पु. ल. देशपांडे
Publisher: मौज प्रकाशन
|
|
Price: $5.99 $4.79 20% OFF ( ~163 Pages, R175)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: वयाची पन्नाशी उलटल्यावर, १९७० साली, बंगाली भाषा शिकण्यासाठी श्री० पु० ल० देशपांडे शांतिनिकेतनात गेले. बंगाली भाषा व रवीन्द्रनाथांचे काव्य यांच्या ओढीचा वारसा त्यांना त्यांचे आजोळचे आजोबा, 'गीतांजली'चे भाषांतरकार वामन मंगेश दुभाषी ऊर्फ 'ऋग्वेदी' यांच्याकडून मिळाला. कुठलीही भाषा शिकायची तर ती जिथे जिवंत पिंडातून उमटत असते त्या ठिकाणी जाऊन, तिची नाना स्वरूपे अनुभवून व भोगून शिकायची असते अशी त्यांची धारणा होती. त्याप्रमाणे ते शांतिनिकेतनात राहिले, तसे कलकत्त्यासारख्या शहरात व सावतालपाड्यांसारख्या ग्रामीण भागांत हिंडले-फिरले. त्या सार्या अनुभवाचे चित्रण 'वंगचित्रे' या त्यांच्या पुस्तकात आहे. पुढे सात वर्षानी पु० ल० बंगालीची उजळणी करण्यासाठी पुन्हा शांतिनिकेतनला गेले. या वेळी बंगालमधील राजकीय परिस्थिती उग्र झालेली होती आणि वातावरण हिंस्र बनलेले होते. त्यामुळे त्यांना मोकळेपणाने हिंडता आले नाही, आणि महिनाभर शांतिनिकेतनात ठाणबंद झाल्यासारखे राहावे लागले. खुद्द शांतिनिकेतनातील वातावरणही बदलले होते. या काळात बंगाली भाषा-वाङ्मयाचे अध्ययन तर त्यांनी केलेच, पण महत्त्वाचे म्हणजे दैनंदिनी लिहिली आणि या मुक्कामातील अनुभवांची नोंद केली. माणसाचे विचार, भावना, आवडीनावडी, घटनांबद्दलची व माणसांबद्दलची मते दैनंदिनीत मोकळेपणाने व्यक्त होतात. प्रस्तुत पुस्तकाचा पहिला भाग या अप्रकाशित दैनंदिनीचा आहे. दुसर्या भागाला 'स्वाध्याय' असे शीर्षक दिले आहे. बंगाली भाषा शिकण्यासाठी पुलंनी हातात पाटी-पेन्सिल घेतली आणि रवीन्द्रनाथांच्या सहजपाठातील धड्यांपासून त्यांची पत्रे, कविता, इतर लेखन यांतील उतार्यांची भाषांतरे व क्वचित स्वैर रूपांतरे केली. त्यांतील निवडक येथे घेतली आहेत. या काळापर्यंत बंगाली भाषेवर त्यांनी जे प्रभुत्व मिळवले होते त्याचे एक गमक गौरकिशोर घोष यांना त्यांनी बंगालीतून लिहिलेल्या पत्रात मिळते. शांतिनिकेतनमधील वास्तव्यानंतरही त्यांचा हा स्वाध्याय चालू राहिला. शांतिनिकेतनातील अनुभवावर व अभ्यासावर आधारलेले पाच लेख तिसर्या भागात संकलित केले आहेत.
|
 |
 |
|