Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


आठवणींची पाऊलवाट
Author: रमेश उदारे
Publisher: आमोद प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $7.31 $5.84 20% OFF ( ~240 Pages, R240)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
"हे पुस्तक म्हणजे चरित्र किंवा आत्मचरित्र नाही, तर फक्त आठवणी आहेत. त्या लिहिण्याचा मोह झाला हे मात्र प्रामाणिकपणे कबूल करतो", अशी कबुली लेखक सुरुवातीलाच देतात. एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात येतात तसे चढ-उतार त्यांच्याही आयुष्यात आले. यातलेच काही त्यांनी शब्दबध्द केलेत. लिखाण म्हणजे पत्रकार मंडळींसाठी डाव्या हातचा खेळ. पण व्यवसायाचा भाग म्हणून दररोज लिहिणे वेगळे आणि स्वत:च्या आनंदासाठी काही लिहिणे वेगळे.

Review courtesy of Maharashtra Times:
म. टा. रविवार, ८ जुलै २०१२
खुमासदार आठवणींचा खजिना
-- हर्षल मळेकर
लिखाण म्हणजे पत्रकार मंडळींसाठी डाव्या हातचा खेळ. पण व्यवसायाचा भाग म्हणून दररोज लिहिणे वेगळे आणि स्वत:च्या आनंदासाठी काही लिहिणे वेगळे. पत्रकार आणि प्रकाशक रमेश उदारे यांच्या ओघवत्या लिखाणातून साकारलेले ' आठवणींची पाऊलवाट ' हे नवेकोरे पुस्तक वाचकांच्या भेटीला आले आहे. ' हे पुस्तक म्हणजे चरित्र किंवा आत्मचरित्र नाही , तर फक्त आठवणी आहेत. त्या लिहिण्याचा मोह झाला हे मात्र प्रामाणिकपणे कबूल करतो ', अशी कबुली लेखक सुरुवातीलाच देतात. एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात येतात तसे चढ-उतार त्यांच्याही आयुष्यात आले. यातलेच काही त्यांनी शब्दबध्द केलेत.
नंदूरबार हे उदारे यांचे गाव. स्वातंत्र्यचळवळीत बालहुतात्मा ठरलेला शिरीषकुमारही याच गावचा. शिरीषकुमार शहीद झाला , तो प्रसंग उदारे यांनी पहिल्याच प्रकरणात दिला आहे. हा प्रसंग त्यांच्या आईने प्रत्यक्ष पाहिला होता. त्यांच्यात वाचनाची आवड आईमुळे निर्माण झाली. ही आवड त्यांना प्रकाशनाचा व्यवसाय , पत्रकारितेपर्यंत घेऊन आली. या लहानशा गावातले रमेश उदारे मुंबईसारख्या महानगरीत कसे पोहोचले , इथे आल्यानंतर अनंत अडचणींना तोंड देत त्यांनी केलेला संघर्ष या पुस्तकात वाचायला मिळतो. मुंबईत आल्यावर सुरुवातीचा बेकारीचा काळ , नोकरी शोधण्याची धडपड हा सारा घटनाक्रम साधारणत: ४०-५० वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात आलेल्यांना त्यांच्या जुन्या दिवसांची आठवण करून देईल. थर्मास बनविण्याच्या कंपनीत त्यांना पहिली नोकरी मिळाली. त्यांच्या काही लेखांमध्ये जुन्या मुंबापुरीचे चित्र उभे रहाते. हिंदुजा हॉस्पिटलच्या जागी असलेला सागरी किनारा , शिवसेना भवन नव्हते तेव्हा तिथे असलेला इराणी , त्याच्याकडे चहा पिऊन ज्यूक बॉक्सवर गाणी ऐकत बसणे या आठवणींतून ते दिसते. प्रमोदकुमार कुश या असिस्टंट डायरेक्टरमुळे त्यांची एव्हरग्रीन देवानंद यांच्याशी भेट झाली. ' गॅंगस्टर ' चित्रपटाच्या कॅसेटच्या प्रकाशन समारंभाला ते गेले होते. तिथे त्यांना हे देवदर्शन घडले.
एव्हरग्रीन देवानंद , ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर , शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे , महाराष्ट्राचे लाडके लेखक पु. ल. देशपांडे , स्वरसम्राज्ञी लतादीदी , मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासह त्यांचे फोटो बघायला मिळतात. ' मंतरलेली माणसं ', ' पावलो पावली ' यासारखी पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. कंपनीत काम करत असताना युरोप सफर करण्याची संधी मिळाली. स्वीडन , फ्रान्स , जर्मनी या देशातल्या भटकंतीचे त्यांचे अनुभव वाचायला मजा येते.
त्यांना भेटलेली साहित्यिक-कवी मंडळी , भावलेली माणसे , आवडलेले सिनेमे यांची वर्ष , तारीखवार अशी संगतवार नोंद नाही. पण , सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे या केवळ आठवणी आहेत. सचिनची भेट , त्याची घेतलेली मुलाखत हे कोणत्याही सचिनप्रेमीला आवडेल. सचिनप्रमाणेच लतादीदी , अमिताभ बच्चन यासारख्या बड्या व्यक्तिमत्त्वांशी झालेल्या भेटी यांच्या आठवणी वाचकांना नक्कीच आवडतील. ' मुंबई संध्या ' या वृत्तपत्रात सहसंपादक म्हणून केलेले काम , रिलायन्समध्ये काम करत असतानाचे दिवस वाचकांना एका वेगळ्या दुनियेची सैर घडवून आणतात. सावरकरांच्या जीवनावर बाबुजींनी म्हणजे सुधीर फडके यांनी सिनेमा बनविण्याचा ध्यास घेतला होता. त्यांच्याशी झालेल्या भेटीत उदारे यांनी त्याविषयीही गप्पा मारल्या होत्या. ' तन , मन , धन ' अर्पून काम करणारी ती मंडळी कुठे आणि आजची भ्रष्टाचाराच्या महाविळख्यात अडकलेली छोटी-बडी माणसे कुठे , अशी खंत व्यक्त करत हे पुस्तक संपते. मात्र तोपर्यंत वाचकांच्या मनात आठवणींचा एक खजिना जमा झालेला असतो.

Write your review for this book

Other works of रमेश उदारे
   नर्गिस
   साहित्य सहवास
   निंबोणीच्या झाडामागे
   मंतरलेली माणसं
   फ फजितीचा

Similar books:
  आठवणी
   नाच ग घुमा
   आहे मनोहर तरी ...
   गणगोत
   पुरचुंडी
   मैत्र
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.